मुंबई : राज्याच्या रोजगार आणि उद्योजकता विभागाकडील नोंदीनुसार राज्यात ६२ लाखांहून अधिक अधिकृत बेरोजगार आहेत. विशेष म्हणजे बेरोजगारीचे हे प्रमाण शासन दरबारी नोंद केलेल्यांचं आहे. याचा अर्थ नोंदणी नसलेल्या बेरोजगारांची संख्या दुप्पट असण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात तब्बल ४ लाख बेरोजगारांची नोंद आहे. त्यामुळे बेरोजगाराच्या मुद्यांचा राजकीय खून झालाय का ? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
हेही वाचा…‘इंद्रायणी रिव्हर सायक्लॉथॉन’ टीमचा विश्वविक्रम; उद्या होणार रॅली! लाँगेस्ट लाईन ऑफ बायसिकल्स स्टॅटिक्स’च्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
पुढे बोलतांना ते म्हणाले की, अलिकडेच एका पात्र शिक्षिक उमेदवार तरूणीने शिक्षणमंत्र्यांना शिक्षक भरतीविषयी सार्वजनिकपणे प्रश्न विचारल्यानंतर राज्याचे शिक्षण मंत्री प्रसारमाध्यमांच्या कॅमे-यासमोर म्हणाले की, “तुझं नाव शोधून काढून तुला अपात्र ठरवू.” म्हणजे बेरोजगार तरूण-तरूणींना जाहीरपणे धमकी देण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती. असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
हेही वाचा…“मनसेच्या आमदाराचा श्रीकांत शिंदेंवर ‘पॉकेटमनी स्कॅम’ आरोप अन् राज ठाकरे पोहचले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला”
दरम्यान, अवकाळी पावसाने ग्रामीण भागातील शेतकरी देशोधडीला लागलाय. मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी शिकणा-या त्यांच्या मुलांकडे खानावळीचं बिल भरण्यासाठीचे पैसे नाहीत. पण सरकार सुशेगात आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राजकीय टीका तावातावाने करतात. पण बेरोजगारीच्या मुद्यावर बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही. दुष्काळ, बेरोजगारी, महागाई या समस्या फक्त वर्तमानपत्रांच्या हेडलाईन होतायत. सरकारने याकडे गांभीर्याने पाहिलं नाही तर बेरोजगार तरूणांनी उद्या कायदा हातात घेतला तर त्याचे फार वाईट परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला भोगावे लागतील. असा इशाराही जितेंद्र आव्हाडांनी दिला आहे.
बेरोजगाराच्या मुद्यांचा राजकीय खून झालाय का?
रा्ज्याच्या रोजगार आणि उद्योजकता विभागाकडील नोंदीनुसार राज्यात ६२ लाखांहून अधिक अधिकृत बेरोजगार आहेत. विशेष म्हणजे बेरोजगारीचे हे प्रमाण शासन दरबारी नोंद केलेल्यांचं आहे. याचा अर्थ नोंदणी नसलेल्या बेरोजगारांची संख्या दुप्पट असण्याची…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 2, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“इडीने मुंबई अन् दिल्लीतलं घर का ताब्यात घेतलं? त्याचाही पुस्तकात उल्लेख करावा,” शरद पवारांचा प्रफुल्ल पटेलांना टोला
हेही वाचा…मावळात श्रीरंग बारणेंच उमेदवार, उदय सामंताचं विधान, राष्ट्रवादी अन् भाजपमध्ये वाढली धाकधूक
हेही वाचा…“स्मशानातून आवाज येतात “माझ्या खुन्याला पकडा”, आव्हाडांच्या ‘या’ टिकेला अजित पवार गटाचं उत्तर
हेही वाचा…ठरलं तर मग..! शरद पवार गट लोकसभेच्या बारामतीसह ‘या’ पंधरा ते सोळा जागा लढविणार
हेही वाचा…“ट्रिपल इंजिन, ट्रिपल वसुली”, मुंबईत तब्बल प्रतिदिन १.६३ कोटी रूपयाची वसुली, कोल्हेंनी सांगितला धक्कादायक अनुभव