मुंबई : सध्या राज्यातील राजकारण राष्ट्रवादीत सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर केंद्रीत झालंय. कर्जत येथील सभेतून अजित पवारांनी शरद पवारांबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यावर आता शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय. त्यावर पुन्हा आता जितेंद्र आव्हाडांवर अजित पवार गटातील नेत्यांनी निशाणा साधला.
हेही वाचा…‘बारामतीचा गड’ उद्धवस्त करण्यासाठी मतांची बेरीज झाली, ‘सुनेत्रा पवार’ नव्हे तर ‘सुळें’च्या विरोधात ‘हा’ तगडा उमेदवार मैदानात ?
जो स्वताच्या राजकिय स्वार्था साठी सख्या काकांचा खड्डा खणत होता. ह्याच काकाचा वारसा हवा होता, त्या काका ला झालेल्या वेदना आणि डोळ्यातले आश्रु उभ्या महाराष्ट्रानी बघितले, जो सख्ख्या चुलत बहीणीचा राजकिय छळ करत होता तीला संपवण्यासाठी अत्यंत हीन पातळी वर जाऊन बोलत होता, स्मशानातून आवाज येतात “माझ्या खुन्याला पकडा” तू आमचा हिशोब विचारणार असा जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.
हेही वाचा…“साडेचार वर्षात काय लफडी केलीत, त्याचे व्हिडीओ शुटिंग, सगळं बाहेर काढणार”, सुजय विखे पाटलांचा रोख नेमका कुणाकडे ?
आव्हाडांच्या टिकेला अजित पवार गटाटे नेते आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिलंय. तुम्हीही काचेच्या घरात राहता, त्यामुळे केवळ आरोपांसाठी आरोप करू नका. असं म्हणत आनंद परांजपे यांनी आव्हाडांना तीन प्रश्न विचारले आहेत. सुरज परमार आत्महत्या प्रकरणात जितेंद्र आव्हाडांनी कोणकोणत्या नेत्याच्या दरवाजावर डोकं ठेवलं होतं, एक कॅबिनेट मंत्री आणि जबाबदारीच्या पदावर असताना आनंद करमुसे यांना अमानुष मारहाण का करण्यात आली आणि त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस सुरक्षारक्षक वैभव कदम याने आत्महत्या का केली आणि त्यासाठी कोण जबाबदार आहे याची उत्तरं राज्यातल्या जनतेला द्यावी असं थेट आव्हान आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाडांना दिलं आहे.
हेही वाचा…“राजकारणात सगळे काही ‘असूर’ आणि ‘बेसूर’ नसतात, तर काही…”, गडकरी, फडणवीसांचा उल्लेख करत शिंदेंचं मोठं विधान
दरम्यान, नेहमी खरं बोलणारा आणि विकास करणारा नेता म्हणून अजितदादांनी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे स्थान निर्माण केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेतील ८० टक्क्यांहून अधिक लोकांनी अजितदादांच्या नेतृत्वाचा प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून स्वीकार केला आहे. त्यामुळे आम्हाला नवीन पक्ष काढण्याची गरज नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचाच आहे, असा विश्वास परांजपे यांनी व्यक्त केला.
जो स्वताच्या राजकिय स्वार्था साठी सख्या काकांचा खड्डा खणत होता …ह्याच काकाचा वारसा हवा होता
त्या काका ला झालेल्या वेदना आणि डोळ्यातले आश्रु उभ्या महाराष्ट्रानी बघितले
जो सख्ख्या चुलत बहीणीचा राजकिय छळ करत होता तीला संपवण्यासाठी अत्यंत हीन पातळी वर जाऊन बोलत होता
स्मशानातून…— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 1, 2023
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. अजितदादा पवार यांच्यावर मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांना पार्टीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुम्हीही काचेच्या घरात राहता, त्यामुळे केवळ आरोपांसाठी आरोप करू… pic.twitter.com/B3dIwmAt1y
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) December 2, 2023
READ ALSO :
हेही वाचा…ठरलं तर मग..! शरद पवार गट लोकसभेच्या बारामतीसह ‘या’ पंधरा ते सोळा जागा लढविणार
हेही वाचा…“ट्रिपल इंजिन, ट्रिपल वसुली”, मुंबईत तब्बल प्रतिदिन १.६३ कोटी रूपयाची वसुली, कोल्हेंनी सांगितला धक्कादायक अनुभव
हेही वाचा…‘इंद्रायणी रिव्हर सायक्लॉथॉन’ टीमचा विश्वविक्रम; उद्या होणार रॅली! लाँगेस्ट लाईन ऑफ बायसिकल्स स्टॅटिक्स’च्या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
हेही वाचा…“मनसेच्या आमदाराचा श्रीकांत शिंदेंवर ‘पॉकेटमनी स्कॅम’ आरोप अन् राज ठाकरे पोहचले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला”
हेही वाचा…दादा भुसे पुर्ण XXX झालाय, माफी मागावी, १७८ कोटींचा आरोप करत भुसेंवर संजय राऊतांचा हल्लाबोल