मालेगाव : गिरणा महोत्सव सहकारी साखर कारखाना बचाव याच्या माध्यमातून मंत्री दादा भुसे यांच्यावर संजय राऊतांनी १७८ कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यावर दादा भुसे यांनी राऊतांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. त्यावर मालेगाव कोर्टाने संजय राऊतांना समन्स पाठवून कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज संजय राऊतांनी कोर्टात हजर झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दादा भूसे यांच्यावर जोरदार टिका केली.
हेही वाचा…ठाकरे गटाची ‘ती’ मागणी नार्वेकरांनी फेटाळली, सत्तासंघर्षाची सुनावणी २२ तारखेपर्यंतच होणार
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यावर राजकीय सुडाची कारवाई केलीय म्हणून ते आज तुरूंगात आहेत. एका बॅंकाच्या कर्जप्रकरणामुळे सरकारच्या दबावामुळे त्यांना अटक झाली आहे. यासंदर्भात त्यांनी सगळ्यांना पत्र लिहिलं आहे. गिरणा महोत्सव सहकारी साखर कारखाना बचाव या नावाखाली विद्यमान मंत्री दादा भूसे यांनी शेतकऱ्यांकडून १७८ कोटी रूपये गोळा केले होते. या पैसाचा हिशोब द्या, हा पैसा कुठे गेला, कुठे गुंतवला ? याच्या शेकडो पावत्या आमच्याकडे आहेत. याचा हिशोब मागितला म्हणून आम्हाला गुन्हेगार ठरवलं असल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलं.
हेही वाचा…“..त्यामुळेच अनिल देशमुखांना मंत्रिपदाच्या यादीतून वगळलं,” अजित पवारांनी केला मोठा दावा
संजय राऊतांनी आयुष्यात कधी कुणाची माफी मागितली नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. जर सत्य हे सत्य असेल तर माफी कुठ मागायची. आम्ही खोट्या भूमिका मांडत नाही. त्याचे पुरावे आहेत. शेतकऱ्यांचा पैसा आहे. त्याचे पुरावे आहेत. माफी कसली मागायची ? याची तर दादा भूसे यांनी माफी मागायला हवी. असं राऊतांनी म्हटलं. तसेच २०२४ नंतर सगळ्या तक्रारींची दखल घेतली जाईल. इडी, सीबीआय, महाराष्ट्राचे पोलिस, हे सर्व स्वत: दखल घेतील. असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा…फडणवीसांनी लोकसभेच्या जागांचा अगोदरच जाहीर केलाय आकडा, अजित पवारांनी आज ४ जागा फिक्स केल्या, शिंदेंच्या वाट्याला किती?
यातच दादा भूसे यांच्याकडून संजय राऊतांनी पुरावे द्यावेत. असं म्हटलं होतं. त्यावर पुरावे काय ? पुरा xxx झालांय अजून पुरावे काय मागतोय ? शेतकऱ्यांच्या पावत्या आहेत आमच्याकडे. आम्ही हिशोब मागतोय. असंही राऊतांनी म्हटलंय. हिरे कुटुंब शिवसेनेत आल्यापासून कारवाया सुरू झाल्या आहेत. परंतु संपुर्ण शिवसेना हिरे कुटुंबियांच्या पाठीमागे आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे आम्ही दोन पावलं पुढे असल्याचंही राऊतांनी सांगितलं.
READ ALSO :
हेही वाचा…‘बारामतीचा गड’ उद्धवस्त करण्यासाठी मतांची बेरीज झाली, ‘सुनेत्रा पवार’ नव्हे तर ‘सुळें’च्या विरोधात ‘हा’ तगडा उमेदवार मैदानात ?
हेही वाचा…“साडेचार वर्षात काय लफडी केलीत, त्याचे व्हिडीओ शुटिंग, सगळं बाहेर काढणार”, सुजय विखे पाटलांचा रोख नेमका कुणाकडे ?
हेही वाचा…“राजकारणात सगळे काही ‘असूर’ आणि ‘बेसूर’ नसतात, तर काही…”, गडकरी, फडणवीसांचा उल्लेख करत शिंदेंचं मोठं विधान
हेही वाचा…राहुल शेवाळेंना ठाकरे गट इंगा दाखवणार, लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंचा ‘हा’ शिल्लेदार सज्ज
हेही वाचा…“आरक्षणासाठी सरकारसोबत जनतेलाही वेठीस धरण्याचं काम”, भुजबळांची टिका