अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर दक्षिण लोकसभा निवडणुक पुन्हा लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. याच जागेवर अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार निलेश लंके यांचं नाव देखील चर्चेत आलंय. परंतु सध्या आता नगरमधील राजकीय वातावरण आरोप-प्रत्यारोपांनी चांगलाचं चर्चेत आलंय. खासदार सुजय विखे पाटलांनी कोणचंही नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत.
हेही वाचा…फडणवीसांनी लोकसभेच्या जागांचा अगोदरच जाहीर केलाय आकडा, अजित पवारांनी आज ४ जागा फिक्स केल्या, शिंदेंच्या वाट्याला किती?
नगर तालुक्यातील पोखर्डी आणि कापुरवाडी येथे विविध विकासकामांचा प्रारंभ सुजय विखे पाटलांच्या हस्ते झाला. त्यावेळी नगर जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजी कर्डिले प्रमुख म्हणून आले आहे. त्यावेळी सुजय विखे पाटलांनी अनेक धक्कादायक आरोप केले आहे. साडेचार वर्षे काय लफडी केली आहेत. रात्री कोण कुणाच्या घरी जातं, कोण कुणाचं खातं, याचे सर्व पुरावे आहे. मी सहा महिन्यापुर्वीचे यांच्यामागे लोकं ठेवली होती. हे काय करतात ? काय नाही. याचे माझ्याकडे व्हिडीओ शुटिंग देखील आहे. सर्व वेळ आल्यावर बाहेर काढणार. असा इशारा सुजय विखे पाटलांनी दिलं आहे.
हेही वाचा…अजितदादांचा गट बारामतीची जागा लढविणार, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या…
दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यात जवळीक वाढल्याचं काही घटनांवरून दिसून येत आहे. त्यावरून सुजय विखे पाटील सातत्याने या दोघांवर टिका टिप्पणी करीत आहेत. यातच अजित पवार गटाकडून निलेश लंके यांच्या नावाची चर्चा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी सुरू आहे. त्याला राम शिंदेंचं पाठबळ असल्याचा दावा सुजय विखे पाटलांच्या समर्थकांकडून केला जात आहे. त्यावरून सध्या नगरमधील वातावरण चांगलचं गाजत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राजकारणात सगळे काही ‘असूर’ आणि ‘बेसूर’ नसतात, तर काही…”, गडकरी, फडणवीसांचा उल्लेख करत शिंदेंचं मोठं विधान
हेही वाचा…राहुल शेवाळेंना ठाकरे गट इंगा दाखवणार, लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंचा ‘हा’ शिल्लेदार सज्ज
हेही वाचा…“आरक्षणासाठी सरकारसोबत जनतेलाही वेठीस धरण्याचं काम”, भुजबळांची टिका
हेही वाचा…ठाकरे गटाची ‘ती’ मागणी नार्वेकरांनी फेटाळली, सत्तासंघर्षाची सुनावणी २२ तारखेपर्यंतच होणार
हेही वाचा…“..त्यामुळेच अनिल देशमुखांना मंत्रिपदाच्या यादीतून वगळलं,” अजित पवारांनी केला मोठा दावा