पुणे : कर्जतमधील मेळाव्यात अजित पवारांनी बारामतीसह, शिरूर, सातारा आणि रायगड लोकसभा निवडणुका लढण्याचे जाहिर केले. त्यानंतर पवार विरूद्ध पवार असा लोकसभा निवडणुकीचा सामना रंगणार असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सुरूवातीपासून बारामती हा पवारांचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे बारामतीचा गड अजित पवारांना जिंकणं तसा सोपा नसेल. यासाठी भाजपच्या पाठिंब्याने अजित पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात वेगळी रणनिती आखण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…“..त्यामुळेच अनिल देशमुखांना मंत्रिपदाच्या यादीतून वगळलं,” अजित पवारांनी केला मोठा दावा
शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी दोन्ही गटाला प्रतिज्ञापत्र दिले आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकीसाठी अमोल कोल्हे अजित पवार गटात येण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. रायगड लोकसभेत विद्यमान खासदार सुनील तटकरे यांची उमेदवारी पक्की मानली जाते तर साताऱ्यात अजित पवार गट श्रीनिवास पाटलांच्या विरोधात उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. याठिकाणी पाहिजे तसा संघर्ष होणार नाही. परंतु बारामतीत पवार विरूद्ध पवार अशी अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…फडणवीसांनी लोकसभेच्या जागांचा अगोदरच जाहीर केलाय आकडा, अजित पवारांनी आज ४ जागा फिक्स केल्या, शिंदेंच्या वाट्याला किती?
बारामतीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु सुनेत्रा पवारांच्या पाठिमागे मोठी यंत्रणा उभी केली तरी इंदापुर, पुरंदर आणि भोरमधून त्यांना साथ मिळेलच असं होणार नाही. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या नावाला भाजप अनुकूल होईलच असं नाही. यातच पुण्यात वचर्स्व राखण्यासाठी बारामती आणि शिरूर या दोन्ही लोकसभेवर आपला उमेदवार असायला हवा, असा कयास अजित पवार गटाकडून बांधला जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…अजितदादांचा गट बारामतीची जागा लढविणार, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या…
बारामतीत ‘कमळ’ फुलवण्यासाठी भाजपने २०२०-२१ पासून ऑपरेशन लोटस अभियान सुरू केलंय. याची सर्व जबाबदारी भाजपने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्याकडे दिलीय. निर्मला सितारणन यांनी बारामतीचे अनेक दौरे देखील केले असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सातत्याने बारामतीवर डोळा ठेऊन आहेत. यातच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळेंच्या विरोधात भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी सुळेंनी कांचन कुल यांचा दीड लाख मतांनी पराभव केला होता.
बारामतीबाबत भाजपने विशेष लक्ष दिलं असून अजित पवारांना कोणालाही उमेदवारी देण्यास शक्य होईल असे दिसत नसल्याने परिस्थिती पाहून याठिकाणी उमेदवार आयातीचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे सुळेंच्या विरोधात पुन्हा एकदा भाजपमधील कांचन कुल यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. कारण दौंड, इंदापुर, आणि खडकवासलामध्ये भाजपची ताकद आहे. याचसोबत अजित पवार गटाची देखील ताकद कांचन कुल यांना मिळेल.
अजित पवार गटातील दत्ता मामा भरणे सद्या इंदापुरमधून आमदार आहेत. त्यांची इंदापुर आणि बारामतीत ताकद आहे. दुसऱ्या बाजूला भोरमध्ये आमदार संग्राम थोपटे यांचे सुळेंसोबत फारसं काही पटत नाही. पुरंदरमधून शरद पवार गटाकडून काॅंग्रेसचे आमदार संजय जगताप यांना उमेदवारी दिली तर अजित पवारांना मानणारा गट आहे. अशा सर्वांच्या मतांची गोळाबेरीज करून सुळेंचा पराभव अजित पवार आणि भाजपला शक्य होईल. अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“साडेचार वर्षात काय लफडी केलीत, त्याचे व्हिडीओ शुटिंग, सगळं बाहेर काढणार”, सुजय विखे पाटलांचा रोख नेमका कुणाकडे ?
हेही वाचा…“राजकारणात सगळे काही ‘असूर’ आणि ‘बेसूर’ नसतात, तर काही…”, गडकरी, फडणवीसांचा उल्लेख करत शिंदेंचं मोठं विधान
हेही वाचा…राहुल शेवाळेंना ठाकरे गट इंगा दाखवणार, लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंचा ‘हा’ शिल्लेदार सज्ज
हेही वाचा…“आरक्षणासाठी सरकारसोबत जनतेलाही वेठीस धरण्याचं काम”, भुजबळांची टिका
हेही वाचा…ठाकरे गटाची ‘ती’ मागणी नार्वेकरांनी फेटाळली, सत्तासंघर्षाची सुनावणी २२ तारखेपर्यंतच होणार