मुंबई : मुंबई महानगरपालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जुहू येथे अनधिकृत बांधकाम केल्याने नोटीस पाठवली होती. त्यानंतर नोटीस दिलेल्या तारखेपर्यंत बांधकाम हटवलं नाही तर पालिकेकडून कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नारायण राणेंना दिला होता. अशातच आता महापालिकेने नारायण राणेंना दिलेला कालावधी आता संपला आहे. त्यामुळे नारायण राणे यांनी आता थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
पेन ड्राईव्हनंतर आता ‘सीडी’ बाहेर येणार; एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
मुंबईतील जुहू येथील अधीश बंगल्याचं बांधकाम अनधिकृत असल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे. त्यानंतर ते बांधकाम हटवण्यासाठी नारायण राणेंना नोटीस पाठवण्यात आली. पंरतु आता महापालिकेने दिलेली मुदद संपली असल्याने नोटिस रद्द करण्यासाठी नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर आज खंडपीठासमोर ही याचिका सादर करण्यात आली असून यावर पालिकेने आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश देत न्यायालयाने यावर तातडीने सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे.
“आमचे आई-बाप काढू नका “; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना सुप्रिया सुळेंनी झाप-झाप झापलं
तारारोड येथील या बंगल्याच्या बांधकामामुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर त्या तक्रारीच्या आधारे आता राणे बंगल्याची तपासणी केली गेली होती. त्यानंतर या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम 15 दिवसांत हटवण्यास सांगितले होते. परंतु आता हे पंधरा दिवस उलटून गेले असून नोटीस रद्द करण्यासाठी नारायण राणेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
प्रवीण दरेकरांना उच्च न्यायालयाचा दणका; मुंबै बॅंक निवडणुक प्रकरणी याचिका फेटाळली
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे यांच्या अधिश बंगल्यावरून राज्यात जोरदार राजकीय वातावरण पेटलं होतं. यावर सत्ताधारी आणि भाजप असा संघर्ष देखील बघायला मिळाला होता. त्यानंतर आता उच्च न्यायालयात उद्या याबाबत काय सुनावणी होणार त्याकडे लक्ष आहे.
Read also:
- पिंपरी-चिंचवडमधील आत्मकेंद्री राजकारण्यांना आमदार महेश लांडगेंची ‘ॲ लर्जी’
- ”धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट काढल्यास तो सुपर डुपर चालेल”; करूणा शर्माचं वादग्रस्त वक्तव्य
- “आम्ही नुसतं म्हणायचं ठाकरे सरकार मात्र हे तर पवार सरकार “; गजानन कीर्तिकारांचा शिवसेनेला घरचा आहेर
- कोल्हापूर उत्तरेत शिवसेनेची तलवार म्यान; पारंपरिक मतदारसंघ सोडला काँग्रेसला
- ” शिवसेना हा दिशा, तत्व नसलेला पक्ष “; केंद्रीय मंत्री राणेंची शिवसेनेवर जहरी टीका