मुंबई : शिवसेना विरुद्ध केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील संघर्ष महाराष्ट्र गेल्या कित्येक वर्षांपासून पाहत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्याचे पुत्र आमदार नितेश राणे हे काही दिवसांपासून शिवसेनेच्या विरोधात आक्रमकतेने भूमिका मांडत आहेत. याकरिता त्यांना काही चुकीची वक्तव्ये केल्यामुळे तुरुंगातही जावे लागले होते.
नुकतीच एमआयएमने महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्हाला समाविष्ट करून घेण्याबाबत प्रस्ताव दिला होता. हिंदुत्वादी पक्ष असणारी शिवसेना विरोधी एमआयएम सोबत आघाडी करणार असा दावा भाजपच्या काही नेत्यांकडून करण्यात आला आणि शिवसेनेला हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरून डिवचण्यात आलं.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही याच मुद्द्यावरून शिवसेनेला डिवचलं आहे. शिवसेना आता एमआयएमचं नाही तर कोणाशीही युती करू शकते. शिवसेनेला आता कोणतीही दिशा राहिलेली नाही. त्यांनी हिंदुत्वाचे तत्व, धोरण सगळंच सोडून दिलेलं आहे. शिवसेना हा पक्ष आता पूर्णपणे दिशाहीन झालेला आहे अशी टीकाही राणे यांनी केली आहे. पत्रकारांनी जेव्हा शिवसेनेबद्दल नारायण राणे यांना प्रश्न विचारला तेव्हा राणे म्हणाले की, जाऊद्या आमचं विमान चुकेल. शिवसेनेवर नेहमीच जहरी टीका करणाऱ्या नारायण राणेंनी अशी भूमिका घेतल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले.
नेत्यांचे फोन टॅप करण्याचा गुजरात पॅटर्न समोर आणणार; रश्मी शुक्ला प्रकरणावरून पटोलेंचा इशारा
प्रत्येकवेळी एमआयएमला भाजपची बी टीम असं संबोधलं जातं,. मात्र हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळेच आम्ही राष्ट्रवादीसोबतयुती तयार करायला असल्याची ऑफर दिलेली आहे. आता यावर राष्ट्रवादीकडून रिप्लाय येईल आणि त्यासाठी आम्ही त्यांची वाट बघत आहोत असं मागील काही दिवसांपूर्वी खासदार इम्तियाझ जलील यांनी स्पष्ट केलं आहे. आता आगामी काळात काय घडामोडी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also:
- पेन ड्राईव्हनंतर आता ‘सीडी’ बाहेर येणार; एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
- “आमचे आई-बाप काढू नका “; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना सुप्रिया सुळेंनी झाप-झाप झापलं
- प्रवीण दरेकरांना उच्च न्यायालयाचा दणका; मुंबै बॅंक निवडणुक प्रकरणी याचिका फेटाळली
- “भारतामधील रस्त्यांचं जाळं 2024 पर्यंत अमेरिकेच्या बरोबरीचे असणार” ; नितीन गडकरी
- “कुठं मरगळ आली असेल तर झटकून टाकावी”; शिवसेनेचे 22 मार्चपासून शिवसंपर्क अभियान