कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरेत विधानसभा पोटनिवडणुकीत कमालीच्या घडामोडी मागील दोन-तीन दिवसांमध्ये घडून आल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने सत्यजीत कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर काँग्रेसकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेने देखील आपली भूमिका जाहीर केली आहे.
“कुठं मरगळ आली असेल तर झटकून टाकावी”; शिवसेनेचे 22 मार्चपासून शिवसंपर्क अभियान
कोल्हापूर उत्तरासाठी माजी आमदार राजेश क्षीरसागर हे आग्रही होते मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघडी धर्माचे पालन करीत ही जागा काँग्रेसला सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे राजेश क्षीरसागर हे नाराज झाले आणि दोन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ होते. अखेर काल संध्याकाळी त्यांनी राहत्या घरी हजेरी लावत जोरदार शक्ती प्रदर्शन केले.
जर मला मागील २०१५ च्या सत्ताकाळात मंत्री पद दिले असते तर आज कोल्हापुरात शिवसेनेची अशी अवस्था झाली नसती असं शल्य राजेश क्षीरसागर यांनी बोलून दाखवलं आहे. शिवसेनेचा कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर चांगला जरब असल्याने मी सध्या यासाठी आग्रही होतो. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यामुळे मी माघार घेतली आहे. आज जरी माघार घेत असलो तरी २०२४ला मात्र कदापि माघार घेणार नाही. शिवसेना कोल्हापूर उत्तरेत २०२४ला मैदानात उतरणार असल्याचं राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं आहे.
मी काल देखील शिवसेनेशी एकनिष्ठ होतो आणि आजही आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश शिरोधार्ह मानून आम्ही काम करत असतो. त्याचा आदेश हा आम्हा शिवसैनिकांसाठी अंतिम आदेश असतो. महाविकास आघाडी होताना जो निर्णय झाला आहे आणि पक्षप्रमुखांचा जो आदेश असेल, त्यांच्या मनात जे असेल त्याप्रमाणे कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काम करण्यात येईल, असेही राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
Read also:
- ” शिवसेना हा दिशा, तत्व नसलेला पक्ष “; केंद्रीय मंत्री राणेंची शिवसेनेवर जहरी टीका
- पेन ड्राईव्हनंतर आता ‘सीडी’ बाहेर येणार; एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
- “आमचे आई-बाप काढू नका “; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना सुप्रिया सुळेंनी झाप-झाप झापलं
- प्रवीण दरेकरांना उच्च न्यायालयाचा दणका; मुंबै बॅंक निवडणुक प्रकरणी याचिका फेटाळली
- “भारतामधील रस्त्यांचं जाळं 2024 पर्यंत अमेरिकेच्या बरोबरीचे असणार” ; नितीन गडकरी