नाशिक : निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी, परिवहन मंत्री अनिल परब आणि आरटीओमधील या ६ वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात, नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत, राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात पदोन्नतीसाठी, तसेच इतर व्यवहारात पैश्यांची मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच, आरटीओ अधिकाऱ्यांच्या मदतीने ३०० कोटी रुपयांचा बदलीचा मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत, यात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह राज्यातील इतर ६ बड्या अधिकाऱ्यांची नावे त्यांनी घेतली होती.
हे पण वाचा, आरटीओ कथित भ्रष्टाचार प्रकरण: परिवहन मंत्री अनिल परबांना पोलिसांकडून क्लिन चीट
यांनतर, अनिल परब यांनी, आपल्यावरील हे आरोप फेटाळून लावले होते. मात्र, या तक्रारीची सखोल चौकशी करण्यासाठी राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, क्राईम ब्रँच युनिटकडून, प्रकरणाची सखोल माहिती घेणार होते. तसेच, ते तक्रारदार पाटील यांच्याशी देखील संपर्क साधणार होते. दरम्यान, आता नाशिक पोलिसांनी या प्रकरणात परब यांना क्लीन चिट दिली असून, यावरून तक्रारदार गजेंद्र पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
हे पण वाचा, मुख्यमंत्र्याचा विदेशात काळा पैसा; त्यांच्याच आशिर्वादाने मला अडकवण्याचा डाव, राणा दाम्पत्याने केले आरोप
“चौकशी अहवालावर मी समाधानी नाही, मी १५ मेला नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांतनंतरच्या ४५ दिवसांत जर कोणताही गुन्हा घडला नाही, असं पोलीस म्हणत असतील, तर त्यांचं हे विधान धक्कादायक आहे. पोलीस याआधी या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे, असं म्हणत होते आणि म्हणून या गुन्ह्याची चौकशी तब्बल ४५ दिवस चालली, आता गुन्हा उघड होत नसेल, तर हे खरंच खूप क्लेशकारक आहे. मी पोलिसांना सगळे सबळ पुरावे दिले असून, तक्रारीत सर्व तथ्य मांडलेली आहेत. तसेच,जबाबात सर्व दस्तावेज दिले आहेत आणि ९ डिजीटल पुरावेही दिले आहेत. या प्रकरणी मी २७ मेला उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे,” असं गजेंद्र पाटील म्हणाले आहेत.
Read Also :
- “लहान मुलांचा अभ्यास झाला नसेल, तर परीक्षेला जाताना त्यांच्या पोटात दुखतंच”
- प्रशांत किशोर-शरद पवारांच्या भेटीचे कोडे उलगडेना! १५ दिवसांतील तिसरी भेट
- आघाडी सरकरमधल्या आणखी एका पक्षाने केली स्वबळावर लढण्याची भूमिका जाहीर
- “आव्हाडांनी माझी दखल घेतली नाही, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जावं लागलं”
- “मुख्यमंत्र्यांचा दृष्टीकोन एक नेता म्हणून वाखाणण्याजोगा”- जितेंद्र आव्हाड