मुंबई : राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरूंगात असणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची अखेर सुटका करण्यात आली. त्यानंतर त्या लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या. रूग्णालयात त्यांच्यावर दोन ते तीन दिवस उपचार सुरू होते. रूग्णालयातून बाहेर पडताच त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच पोलीस ठाण्यात मिळालेल्या वागणुकीसंदर्भात गृहमंत्र्यांकडे तक्रार करण्यासाठी त्या आता दिल्लीला रवाना झाल्या आहेत.
“ओबीसी आरक्षणाचा राज्यात नव्हे तर देशात भाजप सरकारने खुन केला”; छगन भुजबळ भाजपवर कडाडले
मागील काही दिवसापासून अनेक राजकीय घडामोडीनंतर नवनीत राणांची सुटका करण्यात आली. राज्य सरकारने त्यांच्यावर ठेवण्यात आलेला राजद्रोहाचा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने चूकीचा ठरवला आहे. त्यामुळे त्या दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहसचिव यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहे. तसेच पोलीस ठाण्यात मिळालेल्या गैरवर्तवणुकीसंदर्भात देखील त्या चर्चा करणार आहेत.
तुरूंगातून बाहेर पडताच नवनीत राणा यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर जोरदार टिकास्त्र सोडलं. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणुक लढविणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. नवनीत राणा यांचं पत्रकार परिषदमध्ये जे काही वक्तव्य केलं ते आक्षेपार्ह असल्याने त्यांचा आता जामीन अर्ज रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे जामीन अर्ज जर रद्द केला तर नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मातोश्रीवर हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम घेण्यासाठी राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले. मात्र त्यांना हे प्रकरण चांगलचं अंगलट आल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. जवळपास 14 दिवस राणा दाम्पत्य तुरूंगात होते.
Read also:
- तो पोपटासारखा बोलतो, त्याला कोश्यारी असेपर्यंत विधान परिषद देऊ नका? बापटांची शरद पवारांसमोर फटकेबाजी
- “वसंत, तु मिसळ महोत्सव घे, मी येतो”; राज ठाकरेंनी वसंत मोरेंना दिला शब्द
- “राज्य आता पवारांपासून वाचवण्याची वेळ आलीय”; सदाभाऊ खोतांची राष्ट्रवादीवर जोरदार टिका
- “मोदींनी सात वर्षापुर्वी एक स्वप्न पाहिलं होेतं, ते पुर्ण होतंय”; फडणवीसांनी मोकळ्य़ा केल्या भावना
- “बबली मोठी झाली नाही, बबली अजून नासमज”; पेडणेकरांची नवनीत राणांवर मिश्किल टिप्पणी