नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राजकीय ओबीसी आरक्षण, सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर, काल भाजपकडून रस्त्यावर उतरुन जेल भरो आणि चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी, नागपुरातून या आंदोलनाचे नेतृत्व करताना राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, “माझ्या हातामध्ये सूत्रं दिल्यास ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देईन, अशी गर्जना केली.
आंबिल ओढा प्रकरण : महापालिका आयुक्त फडणवीसांच्या भेटीला! महापालिका वर्तुळात चर्चांना उधाण
यावर, आता विविध राजकीय पक्षातून प्रतिक्रिया येत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी, नांदेडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना, “भाजपला आणि फडणवीसांना ओबीसींचा एवढा कळवळा असता, तर त्यांनी भुजबळांना इतकी वर्षे तुरुंगात खितपत ठेवलं नसतं, त्यांचे अतोनात हाल केले नसते. खडसेंसारख्या नेत्याला त्रास देऊन, पक्ष सोडायला भाग पाडलं नसतं. या सगळ्यानंतर आता ओबीसींसाठी आंदोलन करणं, हे किती हास्यापद आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे.
आता आमदार-खासदार होऊ शकणार नाहीत नागरी बँकांचे संचालक, आरबीआयचा आदेश; शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया
तसेच, “फडणवीस काल म्हणाले, सत्ता द्या, मी आरक्षणाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो. म्हणजेच हे सत्तेत आल्याशिवाय काहीच करणार नाहीत आणि सत्ता नसेल तर राज्याला काहीच देणार नाही, हा तर सरळसरळ फडणवीसांचा दुटप्पीपणा आहे. पण, त्यांना फक्त यासाठी सत्तेत येण्याची आता गरज नाही. आम्ही सरकार चालवायला सक्षम आहोत. त्यांनी फक्त बाहेरून आम्हाला मार्ग सांगण्याचं काम करावं,” असं सडेतोड उत्तर फडणवीसांना दिलं आहे.
Read Also :
- “छगन भुजबळांनी या वयात तरी खोटं बोलू नये, तुम्ही त्यावेळी जेलमध्ये होता”
- ओबीसी आरक्षण: जर ‘संघर्ष’ नको मग संवादातून मार्ग का काढत नाही?
- चंद्रकांत पाटलांचं आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळांना, कोल्हापुरात येऊन जाहीर चर्चा करण्याचं खुलं आव्हान
- “…तर मी राजकारणातून संन्यास घेईन”, फडणवीसांचं ठाकरे सरकारला थेट आव्हान
- “एकमेकांच्या चुका काढून दाखवण्यापेक्षा एकत्र येऊन लढा उभारू”, वडेट्टीवारांचे विरोधकांना आवाहन