नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राजकीय ओबीसी आरक्षण, सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर, आज भाजपकडून रस्त्यावर उतरुन जेल भरो आणि चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. आघाडी सरकारच्या नाकर्तेपणापुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले असून, यामुळे ओबीसींचे मोठे राजकीय नुकसान होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून, आज राज्यभरात ठिकठिकाणी हे आंदोलन छेडण्यात आलं आहे.
“एकमेकांच्या चुका काढून दाखवण्यापेक्षा एकत्र येऊन लढा उभारू”, वडेट्टीवारांचे विरोधकांना आवाहन
दरम्यान, नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. यावेळी, फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरादार हल्ला चढवला. विशेष करून त्यांनी काँग्रेसला आपल्या टीकेचं लक्ष्य केलं. “ओबीसी आरक्षणाचा मारेकरी काँग्रेसच आहे,” असं म्हणत त्यांनी, “माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिलीत, तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन,” अशी सिंहगर्जना फडणवीसांनी केली आहे.
“ही वेळ सरकारने आमच्यावर आणली” फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
“आघाडी सरकारनं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही. त्यांनी आम्ही काढलेला अध्यादेश देखील लॅप्स केला. या आघाडी सरकारनंच ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला. यांच्या सरकारमधील काँग्रेसची सत्ता असलेल्या छत्तीसगड, राजस्थानसारख्या राज्यांमध्ये ओबीसी आरक्षण सुरु आहे. मग, केवळ राज्यातीलच ओबीसींचं राजकीय आरक्षण का रद्द झालं,” असा रोखठोक सवाल त्यांनी सरकरला केला आहे.
तसेच, “ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी कोण?, तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्या, आरक्षणाची जी पिटीशन झाली, ज्या पिटीशनमुळे हा दुर्दैवी निकाल आला, ती पिटिशन २ जणांनी दाखल केली होती. त्यातली पहिली व्यक्ती म्हणजे वाशिममधल्या काँग्रेस आमदाराचा मुलगा आणि दुसरी भंडारा जिल्हा परिषदेचा काँग्रेसचा अध्यक्ष”, असं म्हणत काँग्रेसच ओबीसी आरक्षणाचे खरी मारेकरी आहेत”, असा गंभीर केला.
जो तो आपलं आपलं बघत असतो, ओबीसींचं कोण बघणार? – छगन भूजबळ
दरम्यान, पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना काही कालावधीनंतर जमावाला पांगवण्यासाठी ताब्यात घेतले आणि आंदोलनातला जोर कमी करण्याचा प्रयत्न केला, मात्र या अटकेनंतरही या आंदोलनातला जोर तसूभरही कमी झालेला पाहायला मिळालेला नाही. पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वांच्या शहरांत, तसंच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावं, यासाठी भाजपने एल्गार केला.
Read Also :
- पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! सोमवारपासून बदलणार नियम; वाचा नवीन नियमावली
- न्यायालयात ईडीकडून केले गेले मोठे खुलासे, देशमुखांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता!
- “संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचं, हे ज्याला कळतं तोच खरा नेता”- मुख्यमंत्री
- परिस्थिती पाहून स्वबळाचा निर्णय घेऊ, नाना पटोलेंचा यु-टर्न
- यांच्या बायकांनी यांना मारलं, तरी ते मोदीजींनी केलं असं म्हणतील – देवेंद्र फडणवीस