मुंबई – येत्या राज्यसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राज्यसभेच्या एकूण सहा जागांसाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातून प्रत्येकी किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याबाबत आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती शिवसेनेच्या एका नेत्याने दिली. ही निवडणूक महाविकास आघाडीसाठी एक प्रकारची ताकद चाचणी मानली जात आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस महायुती करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.
ममता दीदींच्या पावलावर ठाकरे सरकारचे पाऊलं; केंद्र सरकारच्या विरूद्ध धडक कृती मोहीम
राज्यसभेसाठी शिवसेनेकडून दोन उमेदवार निवडणुकीसाठी उभे केले जाणार आहेत. आपले दोन उमेदवार संसदेच्या वरिष्ठ सभागृहात निवडून आणायचे आहेत, असे शिवसेनेने आधीच स्पष्ट केले. पीयूष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे (भाजप), पी चिदंबरम (काँग्रेस), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी) आणि संजय राऊत (शिवसेना) या महाराष्ट्रातील सहा राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 4 जुलै रोजी संपणार आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस आणि भाजप या चारही पक्षांनी अद्यापही उमेदवार जाहीर केलेले नाहीत. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यांनी निवडणुकीसंदर्भात माहिती देत तीन सत्ताधारी पक्षांच्या प्रत्येकी किती जागा लढवल्या जातील याचा निर्णय आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून घेतला जाईल , असे ते म्हणाले आहेत.
राज ठाकरेंची होणार पुन्हा गर्जना; पुण्याच्या सभेसाठी गृहमंत्र्यांकडून हिरवा कंदील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तापसे यांनीही लवकरच तीन घटक पक्षांची बैठक होणार असल्याची माहिती दिली आहे. तर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत राज्यसभा निवडणुकीसंदर्भात भाष्य करत विरोधकांना खडेबोल सुनावले होते. राजकीय विरोधक सहाव्या जागेसाठी घोडेबाजार करत आहेत, पण महाविकास आघाडीकडे ती जिंकण्याची संख्या आहे.आम्ही लढू आणि जिंकू, असा नारा राऊत यांनी दिला.
अजित पवारांची मोठी घोषणा; राष्ट्रवादी काँग्रेस ‘२७’ टक्के जागांवर ओबीसींना उमेदवारी देणार
संभाजीराजे यांनी नुकतीच राज्यसभेची पुढील निवडणूक अपक्ष म्हणून लढणार असल्याचे जाहीर केले आहे . सर्व पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ते यापूर्वी भाजपशी संबंधित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संकेत दिले आहेत की त्यांचा पक्ष संभाजीराजे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊ शकतो, परंतु शिवसेना आणि काँग्रेसने अद्यापही आपली भूमिका स्पष्ट न केल्याने संभाजीराजेंना निवडणूक जिंकणे कठीण होऊ शकते.
“हनुमानाच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी सीतेविषयी आदर ठेवावा”
राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना 24 मे रोजी जारी होणार आहे. 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. सध्याच्या स्थितीत 288 सदस्यांच्या विधानसभेत भाजपचे सध्या 106 आमदार आहेत. दुसरीकडे शिवसेनेकडे 55, राष्ट्रवादी 53, काँग्रेस 44 आणि 13 अपक्ष आहेत. सध्या एक जागा रिक्त आहे.
Read also:
- “प्रयत्न करणे आपल्या हातात आहे”; OBC आरक्षणाबाबत अजित पवारांंनी दिली मोठी माहिती
- “एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले अन् अयोध्येला निघाले, बृजभूषण लढवय्या माणूस”; संजय राऊत
- “पुरून उरेन तुम्हाला ‘चित्रा वाघ’ म्हणतात मला”; चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष टोला
- “महापालिकेच्या कुठल्याही वार्डात निवडणुक लढवून दाखवावी”; चित्रा वाघ यांना विद्या चव्हाण यांचं खुलं आव्हान
- “पावसाचं कारण सांगून मैदान सोडले, भोंग्याचे कारण सांगून देशपांडे पळाले”