मुंबई : अयोध्येतल्या राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमिनीला घेऊन भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, आपचे खासदार संजय सिंग यांनी केला असून, त्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. १० मिनिटांपूर्वी २ कोटींना खरेदी केलेली जमीन, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने १८.५ कोटींना विकत घेतल्याचा कथित आरोप या आप खासदाराकडून करण्यात आला असून, सीबीआय आणि ईडीकडून चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
हे पण वाचा, ‘तुम्ही कोणतेही गुंड असा, आम्ही जिजाऊंच्या लेकी तुमच्याशी चार हात करायला सज्ज’
दरम्यान, यावरून राज्यात राजकारण पेटले असून, शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये यावरून शिवसेना भवनासमोर अभूतपूर्व असा राडा झाला. यामध्ये भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून केला गेला आहे. तसेच, यांनतर शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये यावरून वाक्युद्ध सुरु आहे. या राड्यावरून भाजपने शिवसेनेला ‘गुंडा पार्टी’ म्हणून हिणवले होते.
हे पण वाचा, आगामी काळात भाजप आणि शिवसेना आमनेसामने उभे ठाकण्याची चिन्हे, अनिल परब म्हणतात…
यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी, ‘शिवसेना भवनावर कुणी चाल करून येत असेल, तर होय, आम्ही गुंड आहोत आणि आम्ही गुंड आहोत हे सांगण्यासाठी, आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. महाराष्ट्राच्या, हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत. ही गुंडगिरी मराठी माणसाने केली म्हणून मुंबई महाराष्ट्रात राहिली. आम्ही ही गुंडगिरी केली म्हणून महाराष्ट्रात, मुंबईत मराठी माणसाचा आवाज आहे”, असं विधान केलं.
हे पण वाचा, ‘अशी दंडुकेशाही चालणार नाही’;भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला इशारा
यावर, आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, “कोणी काहीही बोलतं. कोणताही पक्ष स्वतःला गुंड म्हणून घेणार नाही. आज राज्याचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत. कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवणं, कायद्याने राज्य चालवणं, नियमाने काम करणं, सर्व सहकाऱ्यांना सोबत घेणं प्रत्येकाची जबाबदारी असून काम मुख्यमंत्री त्यापद्धतीने काम करत आहेत”, असं अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
Read Also :
- इंद्रायणीनगरमधील पाण्याच्या टाकीचे काम उपमुख्यमंत्री अजितदादांमुळेच रखडले!
- अजित पवारांनी केली बीड जिल्ह्याच्या मुख्याधिकाऱ्यांची खरडपट्टी, म्हणाले…
- बीडने दाखवली उपमुख्यमंत्र्यांसमोर नाराजी; जमावाने अडवला ताफा, तर इसमाने घातला राडा
- ‘आम्ही तेवढ्या एकाच कारणासाठी महाविकास आघाडीत सामील’- काँग्रेस
- ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार- विजय वडेट्टीवार