मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर राष्टवादीत दोन गट पडले आहेत. शरद पवार गट आणि अजित पवार गट असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होत आहे. तर अनेक कार्यकर्ते , पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका जाहीर करीत आहेत. तर काही आमदार अजूनही तटस्थ आहेत.
हेही वाचा…“गुवाहाटीला जाण्यापुर्वीच राष्ट्रवादीचा भाजपसोबत जाण्याचा प्लॅन होता, पण…,” बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
चंद्रपुर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचा एकही कार्यकर्ता अजित पवार यांच्या सोबत जाणार नाही, आम्ही सगळे शरद पवार यांच्यासोबत राहणार आहोत. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे जिल्ह्याध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी दिली आहे. उद्या मुंबई येथे शरद पवार यांनी बोलवलेल्या बैठकीला सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अजित पवार प्रफुल पटेल, आणि धर्मराव बाबा आत्राम यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना फोन केल्याची वैद्य यांनी माहिती दिली. सर्व १५ तालुक्यांचे अध्यक्ष, शहाराध्यक्ष, सर्व आघाडी प्रमुख अशी जवळपास ७० प्रमुख पदाधिकारी मुंबईत दाखल होणार आहेत.
हेही वाचा…मोठी बातमी…! शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काॅंग्रेसचे १० आमदार भाजपच्या वाटेवर
दरम्यान, उद्या ५ जुलै रोजी शरद पवार आणि अजित पवार गटांकडून पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत आता कोण कुणाच्या बाजूने आहेत, हे चित्र उद्या स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उद्या सर्व बाजूने चित्र स्पष्ट होणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सुप्रिया सुळेंच्या उपस्थित सत्तेत जाण्याचं ठरलं होतं,पण..”, राष्ट्रवादीच्या आमदारांचा गौप्यस्फोट
हेही वाचा…अजित पवारांकडे ‘महसुल खातं’ तर राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना कोणती खाती ? खातेवाटपाची संभाव्य यादी जाहीर
हेही वाचा…राज्यातील बंडानंतर आता निवडणुकांचे वेध, ऑक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणुकांचा हंगाम सुरू
हेही वाचा…शिंदे सरकारमध्ये पहिली ठिणगी…! “अजित पवारांना अर्थमंत्रीपद देऊ नये, शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे ओरड “
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या गोंधळात शिंदेंचाच गेम होणार ? ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा बंडखोरांच्या विरोधात कोर्टात धाव