मुंबई : राज्यातील राजकीय गोंधळामुळे रखडलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका ह्या ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरमध्ये होणार असल्याचा अंदाज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तसेच मनपाच्या निवडणुका ह्या शिवसेनेसोबत लढणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या पॉडकास्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
हेही वाचा…शरद पवारांना अध्यक्ष मानता मग पटेल अन् तटकरेंची हाकालपट्टी मान्य आहे का ? आव्हाडांचा अजित पवारांना सवाल
उद्धव ठाकरेंच्या पक्षाने भरपुर याचिका न्यायालयात दाखल केल्या आहेत. आरक्षणाबाबतची एक याचिका देखील कोर्टात प्रलिंबित असून सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिका एकत्र केल्या आहेत. आणि त्यावर स्टेटस को दिला आहे. या स्टेटस कोमुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. ज्यावेळी स्टेटस को हटेल आणि निकाल येईल तेव्हा निवडणुका होतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्या अंदाजाने ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये निकाल येईल आणि निवडणुका पण होतील असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…राष्ट्रीय अध्यक्ष कोण? सुप्रिया सुळेंना पक्षातून काढून टाकणार का ? अजित पवारांनी दिलं उत्तर,म्हणाले, आता..”
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा भाजपने निर्धार केला आहे. मुंबई १५० नारा देखील भाजपने दिला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर भाजप शिंदेसोबत मनपा निवडणुका लढविणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबई जिंकणार आणि चांगल्या पद्धतीने जिंकणार. हिंदूत्व हा निवडणुकीचा मुद्दा नाही. ती आमची विचारधारा आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदे सरकारमध्ये पहिली ठिणगी…! “अजित पवारांना अर्थमंत्रीपद देऊ नये, शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे ओरड “
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या गोंधळात शिंदेंचाच गेम होणार ? ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा बंडखोरांच्या विरोधात कोर्टात धाव
हेही वाचा…“गुवाहाटीला जाण्यापुर्वीच राष्ट्रवादीचा भाजपसोबत जाण्याचा प्लॅन होता, पण…,” बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा…मोठी बातमी…! शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काॅंग्रेसचे १० आमदार भाजपच्या वाटेवर
हेही वाचा…अजित पवारांची साथ सोडून ‘चार’ आमदार पवारांकडे पुन्हा परतले, शरद पवारांची मोठी रणनीती