मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिंदे गटाची मोठी गोची झाली आहे. यातच आता शिवसेनेतील बंडखोर १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात लवकर सुनावणी घेण्यात यावी, यासाठी ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे.
हेही वाचा…अजित पवारांकडून शरद पवारांना मोठा धक्का, ‘दोन’ बड्या नेत्यावर केली मोठी कारवाई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कोर्टोने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. परंतु विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ठाकरे गटातील आमदार सुनील प्रभू यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेच्या बंडखोर १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा…अजितदादांची पत्रकार परिषद सुरु असतानाच शरद पवारांची मोठी खेळी, नेमकं काय घडलं?
दरम्यान, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी शिंदेंच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून नऊ आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे आता यावर आता काय घडामोडी घडणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“गुवाहाटीला जाण्यापुर्वीच राष्ट्रवादीचा भाजपसोबत जाण्याचा प्लॅन होता, पण…,” बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा…मोठी बातमी…! शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काॅंग्रेसचे १० आमदार भाजपच्या वाटेवर
हेही वाचा…अजित पवारांची साथ सोडून ‘चार’ आमदार पवारांकडे पुन्हा परतले, शरद पवारांची मोठी रणनीती
हेही वाचा…शरद पवारांना अध्यक्ष मानता मग पटेल अन् तटकरेंची हाकालपट्टी मान्य आहे का ? आव्हाडांचा अजित पवारांना सवाल
हेही वाचा…राष्ट्रीय अध्यक्ष कोण? सुप्रिया सुळेंना पक्षातून काढून टाकणार का ? अजित पवारांनी दिलं उत्तर,म्हणाले, आता..”