बुलढाणा – ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्रातील भाजप सरकारने ओबीसी आरक्षणाचा बळी घेतला आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
वेळ पडली तर मी मंत्रिपद देखील सोडेल असा सूचक इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. कुणीही कायमचे सत्तेसाठी आलेले नसतात काहींनी ‘मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल म्हटलं होतं’ अस बोलत फडणवीस यांना देखील डीचवल. तर ओबीसी समाजासाठी मी आहे आणि त्यासाठी मला समाज महत्त्वाचा असून त्यासाठी मी मंत्रिपद देखील त्यागू शकतो असा सूचक इशारा वडेट्टीवार यांनी दिला. जर महाराष्ट्र सरकारकडून ओबीसींवर अन्याय झाला तर मी काय करावं? हे मुख्यमंत्री यांना विचाराव लागेल असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
सूडबुद्धीने गुन्हे दाखल करून नारायण राणेंना नमवण्याचा प्रयत्न; रावसाहेब दानवेंचा गंभीर आरोप
दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन येत्या 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी राज्य सरकारने केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने राज्य सरकारचा हा प्रस्ताव फेटाळत निवडणुका निश्चित वेळेनुसारच होणार असल्याचं म्हटलं. त्यानुसार 21 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार पार पडल्या आहेत. तर, ओबीसी आरक्षित जागांवर स्थगित झालेली निवडणूक 18 जानेवारी रोजी होणार आहेत. तर सर्व जागांची मतमोजणी 18 जानेवारी 2022 रोजी होणार आहे.
Read also:
- नवाब मालिकांनी दोन ऑडिओ क्लिप ऐकवत पुन्हा फोडला बॉम्ब; समीर वानखेडेंवर केले ‘हे’ गंभीर आरोप
- कोरेगाव भिमा पर्यटन स्थळापेक्षा शुरवीरांची भुमी म्हणून ओळखली जावी – नितीन राऊत
- “१२ कोटींची मर्सडिज घेणाऱ्यांनी आता स्वतःला फकीर म्हणू नये”; संजय राऊतांचा मोदींच्या महागड्या गाडीवरून सणसणीत टोला .
- “गावाकडील नारळावरील कुस्ती जिंकून हिंदकेसरी जिंकल्याचा आव आणू नका”; शंभूराजे देसाईंचा राणेंना खरमरीत टोला
- खासदार अमोल कोल्हे यांना डावलले त्यामुळेच शिवाजीराव आढळराव यांची बारी फसली?