औरंगाबाद : नव्या वर्षात महाराष्ट्रातील जनतेसाठी आनंदाची बातमी देणार असल्याचं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. मुंबई-नागपूर हाय स्पीड रेल्वेचे काम कधी सुरू होणार? याबाबत ते म्हणाले की, संकटावर मात करून नवीन सुरुवात केलीय, पुन्हा कोरोना येऊ पाहतोय, आता सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. रेल्वे ही सामान्य माणसाची गरज आहे. त्यामुळे आमचे धोरण आहे, की सर्वप्रथम प्रवाशाची सुरक्षा करणं. देशातील काही भागा रेल्वेने जोडला नव्हता, पूर्वोत्तर राज्यात रेल्वे जोडली नव्हती, आता त्या भागात रेल्वे जोडून वाढवण्यात येत आहे. २०२४ पर्यंत हा सर्व भाग देशाशी रेल्वेने जोडला जाईल, हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे असं रावसाहेब म्हणाले.
बैलगाडा शर्यतीमुळे युवकांचा एक वर्ग वाया जाणार; राष्ट्रवादीच्या नेत्याने व्यक्त केली चिंता
पुढे ते म्हणाले की, रेल्वे वेग सरासरी क्षमता ८० आहे, त्यात मालवाहतूकमुळे कमी होतोय, त्यामुळे त्यात वाढ करण्यात येत आहे. देशातील मोठ्या शहरातील स्टेशन डेव्हलपमेंट कार्यक्रम हाती घेतले जाणार आहे. पुणे, मुंबई विमानतळसारखे रेल्वे स्टेशन केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात ७० स्टेशन विकसित केले जाणार आहेत, तर ७५ वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात येणार आहेत, २ सुरू केल्या असून ४४ प्रगती पथावर आहेत अशी माहिती त्यांनी दिली. तसेच पुण्यातुन राम पथ यात्रा सुरू केलीय. नागपूर, मुंबई, पुणे हे स्टेशन बदलणार असून मेमो ट्रेन मराठवाड्यासाठी सुरू करण्याचा विचार आहे असंही ते म्हणाले. त्यासाठी नाशिक-पुणे रेल्वे संदर्भात भेटी झाल्यात असून भूसंपादन सुरू आहे, राज्य सरकार यासाठी अर्धी रक्कम द्यावी लागेल, ती लवकर दिली तर पुणे-नाशिक रेल्वे लवकर होईल असं दानवे म्हणाले.
महाविकास आघाडी बाबत दानवे म्हणाले की, सूडबुद्धीने गुन्हे दाखल करून राणेंना नमवण्याचा प्रयत्न सुरू आहे. नारायण राणे यांच्या मुलांबाबत असाच प्रकार केला आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, मात्र भाजप नेत्यांवर सूडबुद्धीने गुन्हे दाखल केले जात आहेत असा आरोप त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.
Read also:
- केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या हातात वाघाची शेपटी; व्हायरल पोस्टव्दारे शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न
- राज्यातील १० मंत्र्यांना, २० आमदारांना कोरोनाची लागण; अजित पवारांची धक्कादायक माहिती
- “गल्लीत क्रिकेट जिंकणाऱ्यांकडून वर्ल्डकपवर दावा करणे हे हास्यास्पद “
- राज्यातील १० हजार कर्मचाऱ्यांचे परतीचे दोर तुटले; एसटीचे १० हजार कर्मचारी थेट निलंबित
- ऐनवेळी बैलगाडा शर्यत रद्द करण्यामागे राजकीय डाव; शिवाजीराव आढाळराव पाटलांचा रोख कुणाकडे?