मुंबई – मागील काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या ताफ्यात एक नवीन वाहन समाविष्ट केले आहे. मर्सडिज बेंझ कंपनीची १२ कोटींची गाडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरेदी केली आहे. यावरून सामनाचे संपादक संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
२०२१ साल आता संपले आहे आणि २०२२ साल सुरु झाले आहे. या वर्षात तरी आशेचे किरण म्हणजेच अच्छे दिन दिसणार आहेत का ? असा सवाल करत राऊत यांनी पंतप्रधानांनी खरेदी केलेल्या गाडीवरुन देखील टीका केली आहे.
महागाई, बेरोजगारी कमालीची वाढली आहे. देशात अराजकता माजली आहे. असं असताना या गोष्टींवर कोणताही उपाय पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे नाही. मात्र मोदींनी स्वतःच्या हौसेसाठी तब्ब्ल १२ कोटींची गाडी विकत घेतली आहे. त्यातून केंद्र सरकारची भ्रमंती चालू आहे असा टोलाही संजय राऊत यांनी हाणला आहे.
२०२१ वर्ष अनेक जळमटे तशीच ठेवून सरले आहे. तेच निर्बंध, तेच सर्व प्रश्न २०२२ वर्षाच्या च्या झोळीत टाकून २०२१ सरले तेव्हा लोकांनी फार मोठा जल्लोष केला असे चित्र दिसले नाही.
ऐनवेळी बैलगाडा शर्यत रद्द करण्यामागे राजकीय डाव; शिवाजीराव आढाळराव पाटलांचा रोख कुणाकडे?
मावळते प्रत्येक वर्ष देशाला निराशा आणि अराजकतेच्या दरीत ढकलून देत आहे. आपले पंतप्रधान मोदी हे जगासमोर गंगास्नान करतात. म्हणून देशातल्या लोकांचे नैराश्य दूर झाले नाही किंवा कोरोना वाहून गेला नाही. तो कायम आहे.
१८ डिसेंबर रोजी सर्व प्रसारमाध्यमांनी मोदींच्या फोटो आपल्या वाहिन्यांवरून प्रदर्शित केला. स्वतःस फकीर म्हणवून घेणाऱ्या, प्रधान सेवक म्हणून वावरणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी परदेशी बनावटीची गाडी घेतली. पंतप्रधानांची सुरक्षा, आराम वगैरे गोष्टी महत्त्वाच्या, पण त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये, असं राऊतांनी म्हटलं आहे.
Read also:
- “गावाकडील नारळावरील कुस्ती जिंकून हिंदकेसरी जिंकल्याचा आव आणू नका”; शंभूराजे देसाईंचा राणेंना खरमरीत टोला
- खासदार अमोल कोल्हे यांना डावलले त्यामुळेच शिवाजीराव आढळराव यांची बारी फसली?
- महाविकास आघाडी सरकार हद्दपार करणार; नव्या वर्षी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा संकल्प
- राज्यात लॉकडाऊन लागणार नाही, परंतू निर्बंध अजून कडक करणार – राजेश टोपे
- पंढरपुरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांत जोरदार खडाजंगी; दोन्ही गट आमने-सामने