मुंबई : महायुतीत लोकसभा जागावाटपावरून अजूनही तिन्ही पक्षांत भांडण सुरू असल्याचे दिसून येत आहे. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील मंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेत अनेक मतदारसंघाच्या जागेवरून अडून राहिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात आणि महायुतीत अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून पुढे काय घडणार ? याची उत्सुकता आता सगळ्यांना लागून राहिली आहे.
हेही वाचा…प्रणिती शिंदेंनी सोडवला पाणी वाटपाचा प्रश्न ; आचारसंहितेमधून मिळणार मुभा
नाशिकसह ठाणे, रत्नागिरी-सिंधुदूर्ग आणि औरंगाबाद या जागा सध्या शिंदे गटाकडे आहेत. मात्र या जागांवरून भाजप आणि अजित पवार गटाने अगोदर दावा सांगितला आहे. यातच अनेक मतदारसंघ शिंदेंच्या हातून सुटले आहेत. त्यामुळे आतातरी या जागा जाऊ देऊ नका अशी मंत्र्यांनी शिंदेंकडे मागणी केलीय. यावर चर्चा सुरू आहे. यातून नक्कीच मार्ग निघेल, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटातील मंत्र्यांची समजूत काढली असल्याची माहिती समोर येत आहे. यातच परभणी, उस्मानाबाद या हक्काच्या जागा मित्र पक्षाला दिल्या आहेत. आता युती धर्म आपल्याकडून पाळला गेला आहे. त्यामुळे अजून जागा त्यांच्याकडे जाऊ देऊ नका. असेही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“बाळासाहेबांच्या रिमोट कंट्रोलने चालणाऱ्या कमळाबाईंच्या रिमोट कंट्रोलने आता शिंदेंची शिवसेना चालते”
गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसचे संजय निरूपम कॉंग्रेस पक्षावर नाराज होते. यातच त्यांची पक्षातून हाकालपट्टीही करण्यात आली आहे. या बैठकीत संजय निरूपम यांना पक्षात घेण्याबाबत चर्चाही झाल्याची शक्यता आहे. तर निवडणुकीत १०० टक्के स्ट्राईकरेट ठेवल्यास शिवसेना एनडीए मधील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असेल. असेही बैठकीत सांगण्यात आलं.
READ ALSO :
हेही वाचा…एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश निश्चित, परंतु रोहिणी खडसेंच्या राजकीय भवितव्यावर घोडे अडले ?
हेही वाचा…“तटकरे पुन्हा ‘रायगडचा किल्ला’ भेदून खासदार होणार ?” रायगड लोकसभेची राजकीय गणितं काय ?
हेही वाचा…काल फडणवीसांसोबत चर्चा, आज उमेदवारी रद्द, वंचितने बांदल यांची केली उमेदवारी रद्द
हेही वाचा…घराणेशाहीची ऐशीतैशी..! विदर्भातील १० पैकी ०४ उमेदवार घराणेशाहीतील
हेही वाचा…“जागा मिळाली नाही तर कॉंग्रेसचे सगळे नेते राजीनामा देणार”, आघाडीत ‘या’ जागेवरून कॉंग्रेसची आक्रमक भूमिका