अकोला : राज्यात मागील काही वर्षापासून पक्षफुटीची प्रकरणे गाजत आहेत. यामुळे राज्यातील अनेक नेते पक्षप्रवेश करतांना दिसत आहेत. शिवसेना प्रमाणे राष्ट्रवादीत देखील मोठी फुट पडली. या फुटीत राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते सध्या संभ्रम अवस्थेत आहेत. याचा परिणाम म्हणून अकोल्यातील माजी आमदारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केलाय. त्यामुळे राष्ट्रवादीला याचा मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा…“दडपशाही करणारं मिंधे भाजपा सरकार युवकांच्या जीवावर उठलंय”, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
अकोल्याचे माजी आमदार हरिभाऊ भदे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी हरिभाऊ भदे यांना शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले आहे. याचा मोठा फटका अकोल्यात राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे. २००४ आणि २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत सध्याच्या अकोला पूर्व मतदारसंघातून तत्कालीन भारीप-बमसंच्या तिकीटावर हरिभाऊ भदे निवडून आले होते.
हेही वाचा…शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड, मराठा आरक्षण आंदोलन चिघळलं
दरम्यान, पक्षात मतभे व नाराज असल्याने हरिभाऊ भदे यांनी वंचित बहुजन आघाडी सोडून बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीत मात्र ते फारसे सक्रिय झाले नाहीत. आता निवडणुका जवळ येताच ठाकरे गटाची त्यांनी निवड केलीय. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अकोला पूर्व मतदारंसंघात भदे यांची शिवसेनेकडून दावेदारी वाढलीय.
अकोल्याचे माजी आमदार हरिभाऊ भदे ह्यांनी आज त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी त्यांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. pic.twitter.com/t4izkiExcC
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 3, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“लाठीहल्ल्यानंतर अजित पवार नाराज,” बाहेर पडा, बाहेर पडा, सत्तेतून बाहेर पडा, बारामतीत जोरदार घोषणा
हेही वाचा…तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् अजित पवार सत्तेतून बाहेर पडायची भूमिका घेतील का ?
हेही वाचा…“लाठीहल्ला करण्याचा आदेश देणाऱ्यांना मराठवाड्यात बंदी घाला,” राज ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
हेही वाचा…“दोन्ही उपमुख्यमंत्री किती दिवस तोंड लपवणार ?” विजय वडेट्टीवारांचा खोचक सवाल
हेही वाचा…“महाराष्ट्र द्वेष्ट्या मिंधे- भाजप सरकार..,! अजून किती अन्याय करणार महाराष्ट्रावर?”