मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला ऑपरेशन लोटस चांगलचं महागात पडलं आहे. दुसऱ्या पक्षातून बंडखोरी करणारे १८ पैकी बहुतांशी आमदार पराभूत झाले आहेत. कर्नाटकमधील पराभवासाठी भाजपने चालवलेलं ऑपरेशन लोटस देखील कारणीभूत ठरलयाचं बोललं जात आहे. त्याच कारण म्हणजे भाजपने कर्नाटकमधील काॅंग्रेस-जेडीएसचं सरकार पाडलं होतं. तर २ आमदारांनी निवडणुक लढवली नाही.
हेही वाचा…सत्ता कुणाचीही असो मंत्रीपद घरात येतोच, कर्नाटकच्या निवडणुकीत ‘पाच भाऊ’ आमदारांची चर्चा
एकंदरीतच २०१८ मध्ये कर्नाटकात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. त्यामळे काॅंग्रेसने जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षासोबत सत्ता स्थापन केली होती. मात्र भाजपने ऑपरेशन लोटस राबवून काॅंग्रेस-जेडीएसचं सरकार उलथवून टाकलं होतं. मात्र कर्नाटकमधील जनतेला अशा प्रकारचं सरकार आवडलेलं दिसत नाही. त्यामुळे कर्नाटकमधील जनतेने यावेळी भाजपला नाकारल्याचं स्पष्ट झालं आहे.
हेही वाचा…“कर्नाटकातील विजय हा २०२४ च्या निवडणुकीतील पहिले पाऊल, 2024 साली राहूल गांधी पंतप्रधान होणार”?
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारून पराभव होण्याच्या मार्गावर आहे. कर्नाटक विधानसभा २२४ मतदार संघापैकी काॅंग्रेसने बहुमताचा आकडा पार केला असून आतापर्यंत १२५ जागांवर काॅंग्रेसने आघाडी घेतली आहे. तर भाजप ७०, जेडीएस २२ आणि इतर ७ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे कर्नाटकात भाजपचा सुपडा साफ केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“कर्नाटक में नफरत का बाजार बंद हुआ और मोहब्बत की दुकान खुली है”, राहुल गांधी
हेही वाचा…“कर्नाटकच्या जनतेने भाजपच्या ‘खरेदी विक्री’च्या धोरणाला मुठमाती दिली,” राष्ट्रवादीने डिवचलं
हेही वाचा…“एकत्र लढलो तर राज्यात आघाडीची सत्ता येईल”, कर्नाटकच्या निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
हेही वाचा…“मोदी-शहांच्या बळजबरी सत्तेच जोखडं कर्नाटकच्या जनतेनं निर्भयपणे फेकलं”, ठाकरेंचा हल्लाबोल
हेही वाचा…“अन् राष्ट्रवादीचा उमेदवार पॅक करून महाराष्ट्रात पाठवला,” फडणवीसांचा शरद पवारांना खोचक टोला