मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने भाजपचा सुपडा साफ केला आहे. कर्नाटक विधानसभा २२४ मतदार संघापैकी काॅंग्रेसने 128 जागांवर आघाडी घेतली असून सत्ता स्थापन केला जाणार असल्याचा दावा केला जात आहे. तर भाजपला या निवडणुकीत दारूण पराभवाचा सामाना करावा लागला आहे. यातच कर्नाटकात राजकीय घटनांना वेग आला असून काॅंग्रेसच्या उमेदवारांना बंगळरूत हालवण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा…कर्नाटकात काॅंग्रेसची ताकद..! एकही दिवस प्रचार न करता काॅंग्रेसचा उमेदवार विजयी
कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, आणि महाराष्ट्र ही ४ राज्ये भाजपने खोक्यांचा वापर, तसेच केंद्रीय यत्रणेंच्या दहशतीचा वापर करून पाडली. परंतु कर्नाटकच्या विजयाने सिद्ध झालं की, लोकांना सुडाचं राजकारण आवडत नाही आणि त्यामुळेच कर्नाटच्या जनतेने काॅंग्रेसला स्पष्ट बहुमत देत भाजपच्या खरेदी विक्रीच्या धोरणाला मुठमाती दिली. हाच या विजयाचा अन्वयार्थ असल्याचं जितेंद्र आव्हडांनी सांगितले आहे.
हेही वाचा…“कर्नाटकात ८४ % हिंदू व फक्त १२ % मुस्लिम, भाजपचे मुस्लिमद्वेषी हिंदूत्व हिंदू जनतेने नाकारले”
पुढे बोलतांना ते म्हणाले की, आज सामान्य जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त आहे. परंतु यावर काहीच न बोलता, द्वेष आणि फक्त द्वेष पसरवण्याचं काम सत्ताधारी गटाकडून सुरू आहे. पैश्याचा, खोक्यांचा वारेमाफ वापर करून, प्रसंगी केंद्रीय यत्रंणांना हाताशी धरून सत्तेचा जो माज सत्ताधारी गटाला चढला होता, तो माज मात्र समान्य जनतेच्या नजरेत खुपत होता, लोकांनी त्यांचा हा राग मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त केला. असंही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…किशोर आवारेंची हत्या, सुनील शेळकेंनी आरोप फेटाळले, चौकशीला तयार, सुत्रधार शोधा
तर अलिकच्या काळात भाजपने ज्या ठिकाणी सत्ता नाही तिथे आमदार फोडून राज्य घेण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी केले तेच कर्नाटकात देखील भाजपने लोक फोडले. मध्य प्रदेशातही आमदार फोडून कमलनाथ यांचे सरकार पाडण्यात आले. गोव्यातही भाजपने तेचे केले. यंत्रणा आणि साधनसंपत्ती वापरून सरकार पाडण्याची एक नवीन पद्धत सुरू झाली आहे. ही गोष्ट चिंताजनक आहे. मात्र फोडाफोडी आणि खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही, ही गोष्ट कर्नाटकच्या निकालाने दाखवून दिले असल्याचंही शरद पवारांनी सांगितले.
कर्नाटक,गोवा,मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र ही 4 राज्ये भाजपने खोक्यांचा वापर,तसेच केंद्रीय यत्रणेंच्या दहशतीचा वापर करून पाडली.
परंतु कर्नाटकच्या विजयाने सिद्ध झालं की,
लोकांना सुडाच राजकरण आवडत नाही.आणि त्यामुळेच कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमत देत भाजपच्या “खरेदी…— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 13, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“एकत्र लढलो तर राज्यात आघाडीची सत्ता येईल”, कर्नाटकच्या निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
हेही वाचा…“मोदी-शहांच्या बळजबरी सत्तेच जोखडं कर्नाटकच्या जनतेनं निर्भयपणे फेकलं”, ठाकरेंचा हल्लाबोल
हेही वाचा…“अन् राष्ट्रवादीचा उमेदवार पॅक करून महाराष्ट्रात पाठवला,” फडणवीसांचा शरद पवारांना खोचक टोला
हेही वाचा…सत्ता कुणाचीही असो मंत्रीपद घरात येतोच, कर्नाटकच्या निवडणुकीत ‘पाच भाऊ’ आमदारांची चर्चा
हेही वाचा…“कर्नाटकातील विजय हा २०२४ च्या निवडणुकीतील पहिले पाऊल, 2024 साली राहूल गांधी पंतप्रधान होणार”?