मुंबई : मुंबई कर्नाटकच्या निकालानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची बैठक बोलवली आहे. यावर सविस्तर चर्चा करणार आहोत, कर्नाटकात ज्या ज्या ठिकाणी प्रचार केला तिथे लोकांचा प्रचंड प्रतिसाद बघायला मिळाला. जर राज्यात आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणुकीला सामारे गेलो तर उद्याच्या निवडणुकीत ते चित्र दिसेल. असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधान केलं आहे.
हेही वाचा…“कर्नाटकात ८४ % हिंदू व फक्त १२ % मुस्लिम, भाजपचे मुस्लिमद्वेषी हिंदूत्व हिंदू जनतेने नाकारले”
तर अलिकच्या काळात भाजपने ज्या ठिकाणी सत्ता नाही तिथे आमदार फोडून राज्य घेण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी केले तेच कर्नाटकात देखील भाजपने लोक फोडले. मध्य प्रदेशातही आमदार फोडून कमलनाथ यांचे सरकार पाडण्यात आले. गोव्यातही भाजपने तेचे केले. यंत्रणा आणि साधनसंपत्ती वापरून सरकार पाडण्याची एक नवीन पद्धत सुरू झाली आहे. ही गोष्ट चिंताजनक आहे. मात्र फोडाफोडी आणि खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही, ही गोष्ट कर्नाटकच्या निकालाने दाखवून दिले असल्याचंही शरद पवारांनी सांगितले.
हेही वाचा…किशोर आवारेंची हत्या, सुनील शेळकेंनी आरोप फेटाळले, चौकशीला तयार, सुत्रधार शोधा
कर्नाटकमध्ये भाजपला ६५ ठिकाणी, तर काँग्रेसला तब्बल १३३ जागांवर यश मिळेल, असे दिसत आहे. याचा अर्थ काँग्रेसला भाजपपेक्षा दुप्पट जागा मिळणार असे दिसत आहे. भाजपचा सपशेल पराभव करण्याची भूमिका कर्नाटकच्या जनतेने घेतली. याचे मुख्य कारण म्हणजे भ्रष्टाचार, सत्तेचा, साधनांचा गैरवापर आणि लोक फोडून आपण राज्य करु शकतो, याविषयी सत्ताधाऱ्यांना असलेला विश्वास.. याविरोधात जनतेमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली. मी कर्नाटकच्या जनतेचे व काँग्रेस पक्षाचे अभिनंदन करतो की देशामध्ये ज्या चुकीचे वातावरण पसरवणाऱ्या प्रवृत्ती आहेत त्यांना एक प्रकारचा धडा शिकवला. आता ही प्रक्रिया संबंध देशात होईल. असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…कर्नाटक विधानसभा निवडणुक निकाल..! “द्वेषाचं दुकान फार काळ चालणार नाही, हा मोदीजींचा पराभव”
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, दिल्ली, झारखंड, पंजाब, पश्चिम बंगाल अशा बहुतांश राज्यात भाजप सत्तेबाहेर जात आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होतील तेव्हा देशात काय चित्रं असू शकते, याचा अंदाज कर्नाटकच्या निवडणुकीतून करू शकतो. कर्नाटकच्या निवडणुकीत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा उपयोग झाला असे म्हणता येईल. आम्ही कर्नाटकात जाऊ असे जे सीमा भागातील लोक म्हणत होते ते मुळात महाराष्ट्रातील नव्हते तर ते कर्नाटकातील होते. याची आम्ही माहिती घेतली. पण महाराष्ट्राची, महाराष्ट्राच्या सरकारची बदनामी करणे, हे त्यामागील सूत्र होते हे देखील लोकांना कळले.
READ ALSO :
हेही वाचा…“मोदी-शहांच्या बळजबरी सत्तेच जोखडं कर्नाटकच्या जनतेनं निर्भयपणे फेकलं”, ठाकरेंचा हल्लाबोल
हेही वाचा…“अन् राष्ट्रवादीचा उमेदवार पॅक करून महाराष्ट्रात पाठवला,” फडणवीसांचा शरद पवारांना खोचक टोला
हेही वाचा…सत्ता कुणाचीही असो मंत्रीपद घरात येतोच, कर्नाटकच्या निवडणुकीत ‘पाच भाऊ’ आमदारांची चर्चा
हेही वाचा…“कर्नाटकातील विजय हा २०२४ च्या निवडणुकीतील पहिले पाऊल, 2024 साली राहूल गांधी पंतप्रधान होणार”?
हेही वाचा…कर्नाटकात काॅंग्रेसची ताकद..! एकही दिवस प्रचार न करता काॅंग्रेसचा उमेदवार विजयी