मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जोरदार प्रचारानंतही भाजपने कर्नाटक गमावला आहे. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत २२४ मतदारसंघापैकी काॅंग्रेसने १३२ जागांवर मोठी आघाडी घेत भाजपवर विजय मिळवला आहे. तर भाजपला या निवडणुकीत ६४ जागा मिळाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावरून भाजपवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…किशोर आवारेंची हत्या, सुनील शेळकेंनी आरोप फेटाळले, चौकशीला तयार, सुत्रधार शोधा
उद्धव ठाकरे म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आण गृहमंत्री अमित शहा यांच्या हुकूमशाहीचा पराभव आहे. अन् या हुकूमशाहीचा पराभव होण्याची सुरूवात कर्नाटकातून झाली आहे. शहाणेपणाने दिलेल्या निकालानंतर कर्नाटकच्या जनतेचं अभिनंदन. उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
हेही वाचा…कर्नाटक विधानसभा निवडणुक निकाल..! “द्वेषाचं दुकान फार काळ चालणार नाही, हा मोदीजींचा पराभव”
पुढे ठाकरेंनी असं म्हटलं की, या निवडणुकीनंतर कर्नाटकनं देशाच्या राजकारणाला नवी दिशा दाखवली आहे. मोदी आणि शहांच्या बळजबरी सत्तेच जोखडं कर्नाटकच्या जनतेनं निर्भयपणे फेकलं आहे. कर्नाटकात हिंदू-मुस्लिम, बजरंग बली, हिसाबसारखे धार्मिक तणावाचे मुद्दे चालले नाहीत. काॅंग्रेसने लोकांच्या प्रश्नावर निवडणुक लढविली आणि ती जिंकली. 2024 सालच्या विजयाची नांदी आहे. यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे खास अभिनंदन. असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अन् राष्ट्रवादीचा उमेदवार पॅक करून महाराष्ट्रात पाठवला,” फडणवीसांचा शरद पवारांना खोचक टोला
हेही वाचा…सत्ता कुणाचीही असो मंत्रीपद घरात येतोच, कर्नाटकच्या निवडणुकीत ‘पाच भाऊ’ आमदारांची चर्चा
हेही वाचा…“कर्नाटकातील विजय हा २०२४ च्या निवडणुकीतील पहिले पाऊल, 2024 साली राहूल गांधी पंतप्रधान होणार”?
हेही वाचा…कर्नाटकात काॅंग्रेसची ताकद..! एकही दिवस प्रचार न करता काॅंग्रेसचा उमेदवार विजयी
हेही वाचा…“कर्नाटकात ८४ % हिंदू व फक्त १२ % मुस्लिम, भाजपचे मुस्लिमद्वेषी हिंदूत्व हिंदू जनतेने नाकारले”