पुणे : आगामी महापालिका निवडणुकीचा मार्ग साफ करण्यासाठी भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांच्यावर हल्ला करुन जीवे मारण्याचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने मनसेच्या तिघा कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
सरकारने विश्वास संपादन करावा, त्यांच्यावर लोक विश्वास ठेवायला तयार नाही- राजू शेट्टी
वितुल ऊर्फ विकी वामन क्षीरसागर (वय ३३, रा. साने गुरुजीनगर, आंबिल ओढा कॉलनी), मनोज संभाजी पाटोळे (वय ३०, रा. साने गुरुजीनगर) आणि महेश इंद्रजित आगलावे (वय २५, रा. लोहियानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विश्रामबाग पोलिसांनी कट रचणे (१२० ब) आणि गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे (११५) कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
“बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है, चंद्रकांत पाटलांचे शिवसेनेला थेट आव्हान
धीरज घाटे हे आंबिल ओढा कॉलनी परिसरातून निवडून आले आहेत. आरोपी विकी क्षीरसागर हा पूर्वी घाटे यांच्याबरोबर काम करीत असे. मात्र, ५ वर्षांपूर्वीपासून त्याने घाटे यांचे काम करणे बंद केले. विकी क्षीरसागर याचा भाऊ राकेश क्षीरसागर हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. २०२२ मधील महापालिका निवडणुकीसाठी राकेश क्षीरसागर इच्छुक आहे. विकी क्षीरसागर हा घाटे यांच्याबरोकर काम करणार्या कार्यकर्त्यांना त्याच्याबरोबर काम करावे, यासाठी वेगवेगळी प्रलोभने दाखवित असे. त्याचबरोबर घाटे यांच्या काही कार्यकर्त्यांबरोबर त्यांनी २०२० मध्ये तीन ते चार वेळा भांडणेही केली होती. तेव्हा घाटे यांनी दोघांना समजावून सांगितले होते. तरीही विकी क्षीरसागर व संतोष रणदिवे यांनी सुधीर म्हस्के यांना हाताने मारहाण केली होती. त्याबाबत म्हस्के यांनी दत्तवाडी व स्वारगेट पोलिसांकडे तक्रार दिली होती.
अनिल देशमुख यांच्याबाबत राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट करावी – केशव उपाध्ये
धीरज घाटे यांनी नवी पेठेतील ए जे कॉम्प्लेक्समध्ये जनसंपर्क कार्यालय सुरु केले आहे. तेथे ते ३ सप्टेंबर रोजी कामकाज पहात होते. नेहमीप्रमाणे ते व त्यांचे कार्यकर्ते अमर आवळे हे चहा पिण्यासाठी शास्त्री रोडवरील शेफ्रन हॉटेलमध्ये सायंकाळी ४ वाजता गेले होते. ते ए सी रुममध्ये बसले असताना आणखीन तिघे जण तेथे आले. त्यांच्यापैकी एकाकडे काळी बॅग होती. हॉटेलमध्ये ते बसले असताना घाटे यांना जाणवले की ते अधून मधून त्यांच्याकडे पहात आहे. अमर आवळे यांनाही संशय आला. त्यामुळे अमर यांनी बाहेर जाऊन परत आले. तेव्हा त्यांना हॉटेलबाहेर विकी क्षीरसागर व मनोज पाटोळे हे थांबलेले आढळून आले. त्यांनी हे घाटे यांना सांगितले.
राज्यात कॉलेजेस कधी सुरू होणार? अखेर मुहूर्त ठरला! उदय सामंत यांची मोठी घोषणा
त्यानंतर संजय धोत्रे यांना कामे सांगायची असल्याने घाटे यांनी त्यांना हॉटेलमध्ये बोलावून घेतले. त्याप्रमाणे संजय धोत्रे हे अर्धा पाऊण तासाने आले. त्यावेळी हॉटेलमध्ये बसलेले तिघे जण त्यांच्या हालचालीकडे बारीक लक्ष देत होते व घाटे यांच्याकडे संशयितरित्या पाहत होते. त्यांच्यापैकी एक जण त्यांच्याकडे पहात हॉटेल बाहेर गेला. त्यानंतर इतर दोघे निघून गेले. त्या तिघांचा संशय आल्याने त्यांनी १० मिनिटांनी दुसरीकडे चहा पिण्यासाठी जाण्याचे ठरविले. बाहेर आल्यावर अमर आवळे याने घाटे यांना सांगितले की, या तिघांपैकी एक जण हा विकी क्षीरसागर व मनोज पाटोळे यांच्याबरोबर काही तरी बोलत होता. त्यांच्या हातात एक बॅग होती. त्यानंतर ते भांडारकर रोडवरील इराणी कॅफे येथे चहा पिण्यास गेले. तेथे चहा पित असताना शेफ्रन हॉटेल येथील संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज पाहून माहिती घेण्याचे त्यांनी ठरविले.
‘या’ ५ जिल्ह्यांना तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका, आरोग्यमंत्र्यांनी दिला सतर्कतेचा इशारा
त्याप्रमाणे ६ सप्टेंबर रोजी अमर आवळे याला शेफ्रन हॉटेलमध्ये पाठवून सीसीटीव्ही फुटेज घेतले. ते फुटेज पाहिले असता हॉटेलमधील ते संशयित विकी क्षीरसागर व मनोज पाटोळे यांच्याशी ते निगडीत होते. त्यावेळी हॉटेलचे एका बाजूला ज्ञानल मंगल कार्यालय व दुसर्या बाजूला संकल्प मंगल कार्यालय आहे. त्या ठिकाणीही विकीचे साथीदार थांबलेले होते. त्यानंतर घाटे हे त्या मंगल कार्यालयात गेले. तेथे संशयित व्यक्तीबाबत चौकशी करता त्यांना समजले की त्या व्यक्तींना कार्यालयातील स्टाफने हटकले होते. त्यावेळी त्यांनी हॉलची माहिती घेण्यास आलो आहे असे सांगितले, अशी त्यांना माहिती मिळाली. त्यावरुन घाटे यांना खात्री झाली की आगामी महापालिका निवडणुकीत विकी क्षीरसागर याचा भाऊ राकेश क्षीसागर सहज निवडुन यावा, या करीता त्याने चार ते पाच साथीदारांना जमवून घाटे यांचा खुन करण्याचा कट रचून प्रत्यक्ष शेफ्रन हॉटेल येथे त्यांच्यावर हल्ला करण्याकरीता आला होता. अशी धीरज घाटे यांनी फिर्याद दिली.
Read Also :
- राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागणार का? विजय वडेट्टीवारांचं दिलं स्पष्टीकरण
- भावना गवळींच्या ट्रस्टशी संबंधित दोघांना ईडीचे समन्स; मागितली १५ दिवसांची वेळ
- चंद्रकांत पाटलांनी महापालिका निवडणुकीचा शड्डू ठोकला; एकाच वेळी एक लाख कार्यकर्त्यांशी संवाद
- परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढल्या, भ्रष्टाचारप्रकरणी जामीनपात्र वॉरंट जारी
- हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या काँग्रेसशी हातमिळवणी करताना लाज वाटली नव्हती का? – प्रसाद लाड