मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप असा राजकीय संघर्ष बघायला मिळत आहे. मात्र अशातच आता अलिकडेच विकास निधीवरून काॅंग्रेस आणि शिवसेनेचे काही आमदार नाराज असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. त्याचबरोबर आगामी काही काळात महापालिकेच्या निवडणुका देखील होऊ घातल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय नेते एकमेकांना पळवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपनेते प्रसाद लाड यांनी महत्वपूर्ण भाष्य केलं आहे. त्याच बरोबर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे.
“जो हिन्दू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा”; भाजप नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करताना प्रसाद लाड म्हणाले की, उद्धव ठाकरे सभागृहात म्हणाले की तळमळतंय, जळमळतंय. मात्र आता त्यांनाच आपल्या पक्षातील खासदारांची तळमळ, जळजळ दुर करता आली नाही. त्यांच चूर्ण आमच्याकडे आहे आणि आम्ही ते योग्यवेळी देऊ असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
“शेण खाणारी राष्ट्रवादीची औलाद आमची नाही”; मनसेची राष्ट्रवादी, शिवसेनेवर जहरी टीका
तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृपेमुळेच शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत. शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 14 खासदार आमच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. ते आम्ही योग्यवेळी जाहीर करू. त्याचबरोबर शिवसेनेचे 24-25 आमदार देखील त्यांच्या नाराज असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शिवसेना नेत्यांना पालकमंत्री दाद देत नाहीत. हे आता उघड झालं आहे. त्यामुळे त्यांच्या मनातील मळमळ दिसून येत आहे. मशिदीवरील भोंग्याबाबात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेचंही आम्ही स्वागत करतो. बाळासाहेब ठाकरे यांनी भोंगे आणि आजन संदर्भात जी भूमिका जाहीर केली होती. शिवसेनेची ती भूमिका आता बदलली आहे का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला आहे.
“शिवसेना म्हणजे राष्ट्रवादीची ‘ढ’ टिम”; आदित्य ठाकरेंच्या टिकेला मनसेचं प्रत्युत्तर
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसैनिक नाराज असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर येत होत्या. त्याचबरोबर अलिकडेच राज्यात शिवसेनेच्या खासदारांनी शिवसंपर्क अभियान रावबलं होतं. त्या अभियानात देखील नाराजीचं सुर बघायला मिळाले होते.
Read also:
- कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही; रिपाइंची राज ठाकरेंविरोधात कारवाई करण्याची मागणी
- राज ठाकरेंचा मशिदीवरील भोंग्यांना विरोध; पुण्यात वसंत मोरेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
- कोल्हापूरात राजकीय आखाडा तापला; प्रचारासाठी मैदानात उतरली युवा नेत्यांची फौज
- “ते अज्ञान लोक पंपावर पळून गेले की कदमवाडीला?”; सतेज पाटलांचा भाजपला खोचक सवाल
- राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यांवर मुस्लिम समाज नाराज! पुण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे