अहमदनगर : राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू सध्या महाराष्ट्राच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आल्या असून उद्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपती शनिशिंगणापूर येथे येणार आहेत. दुपारी दोन वाजता राष्ट्रपती शनीचे दर्शन घेणार असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जळवपास एक ते दीड तासांचा वेळ राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू या शनिशिंगणापूर देवस्थान परिसरात असल्याने याची जय्यत तयारी सुरू केली आहे. यातच श्री. क्षेत्र शनिशिंगणापुर देवस्थानमध्ये विश्वस्त मंडळाच्या परवानगीने कोट्यावधीचा भ्रष्ट्रचार व अनधिकृत कामगार भरती, अनधिकृत बोगस विश्वस्त मंडळ बरखास्त करून त्वरीत प्रशासकाची नेमणूक केली जावी यामागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे व अशोक टेमके इत्यादी जण उपोषणाचा बगडा उचलला आहे. त्यांनी यासंदर्भात धर्मादाय आयुक्त कार्यालय अहमदनगर, पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकारी, पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन, तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. त्यामुळे एका बाजूला राष्ट्रपती पहिल्यांदाच दर्शनासाठी येत असतांना देवाच्याच दारी भ्रष्टाचार सुरू असल्याने याची राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…“मराठ्यांना कुणबीचा दाखला देण्यावाचून आता देशातील कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही”
ऋषिकेश शेटे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात काही लोकप्रतिनिधींचा देखील उल्लेख केला आहे. माजी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी अनधिकृत भरती केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तसेच शनी शिंगणापुर देवस्थान येथे दर्शन पावतीमध्ये २ कोटींचा भ्रष्ट्राचार करून अनेक खाजगी शिक्षम संस्था घेतल्याचाही आरोप लावण्यात आला आहे. त्यामुळे देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करून ताबडतोब प्रशासक नेमणूक करण्यात यावी. तसेच बोगस कामगार भरती, याची चौकशी करून समितीची नेमणूक करण्यात यावी, यातच श्री शनिश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था अधिनियम २०१८ च्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा…ललित पाटील कुणाला हप्ते देत होता? 40 पोलिस, काही नेते, सुषमा अंधारेंच्या हाती लागलं ‘ते’ पत्र
शनि शिंगणापुर देवस्थान सुशोभीकरणासाठी २० कोटी रूपये मंजूर झाले, परंतु मंदिराचे काम अद्यापही पुर्ण झाले नाही. यातच मंदिरासाठी ४० लाखांची रूग्णावाहिका विकत घेण्यात आली. परंतु पुढच्याच महिन्यात त्या गाडीचा लिलाव होऊन स्थानिक पुढाऱ्यांच्या मदतीने फक्त ९० हजार रूपायात विकली जाते. यासोबत आजपर्यंत शेकटो रूपये कोटी रूपयाचा भ्रष्टाचार झाला असून वेळोवेळो याची प्रशानसनाकडे तक्रार अर्ज देऊनही कारवाई झाली नाही. त्यामुळे आता या भ्रष्ट्रचाराच्या विरोधात आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ऋषिकेश शेटे यांनी दिला आहे. यातच या उपोषणाला विश्व हिंदू परिषद मठ मंदिर समिती प्रश्चिम महाराष्ट्र प्रमुख मनोहर ओक यांनी देखील पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…“जाती जातीत भांडण करणाऱ्या नेत्यांमध्येच भांडणं, तीन पक्षांचा तमाशा”, यशोमती ठाकूर यांनी डिवचलं
दरम्यान, खंडोबा यात्रा निमित्ताने समस्थ गावकरी यात्रा कमिठीने १७ डिसेंबरला महालक्ष्मी हिवरे येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे एका बाजूला देवाच्या मंदिरात कोट्यावधीचा भ्रष्ट्रचार होत असतांना दुसऱ्या बाजूला आयोजकांनी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे एका बाजूला देवदर्शन करायचं आणि दुसऱ्या बाजूला देवाच्या परिसरात नाचगाणं करायचं ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. यातच इतिहासात देशाच्या राष्ट्रपती शनिशिंगणापुरला येत असताना त्याआधीच देवस्थानातील भ्रष्ट्राचारासाठी काही सामाजिक कार्यकर्ते उपोषण करीत असतील तर त्यांना योग्य न्याय मिळणार का ? असा सवाल देखील यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“हिंदूच्या शोभायात्रेत सहभागी झाला म्हणून दलित युवकाची हत्या”,SIT मार्फत चौकशी करण्याची वडेट्टीवारांची मागणी
हेही वाचा…मोठी बातमी..! ललित पाटील प्रकरणाबाबत ससून रूग्णालयातील कर्मचाऱ्यांवर चौकशीचा बडगा
हेही वाचा…अद्वय हिरेंनंतर बंधू अपुर्व हिरेंच्याही विरोधात गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…वाद पेटला..! ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींच्या गाडीची तोडफोड, शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक
हेही वाचा…रविकांत तुपकरांसमोर राज्य सरकार झुकलं, ७० ते ८० टक्के मागण्या मान्य, १५ दिवसांची दिली मुदत