नवी दिल्ली : आगामी वर्षात गुजरात, हिमाचल प्रदेश याठिकाणी विधानसभा निवडुका होऊ घातल्या आहेत. दिल्ली, पंजाबमध्ये आपने सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांचा आता पुढचा लक्ष्य या हिमाचल प्रदेशच्या निवडुकांकडे आहे. अशातच आज जयपुरमध्ये भाजपच्या देशभरातील पदाधिकांऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सुचना केल्या आहे.
“आमचा गुडलक म्हणून तुम्ही सत्तेत”; नाना पटोलेंचा आदित्य ठाकरेंना टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या महिन्यात भाजपला केंद्रात 8 वर्ष पुर्ण झालं आहे. ही वर्ष देशाची सेवा करण्याची होती. गरीबांच्या आणि मध्यम वर्गाच्या कल्याणासाठी, महिलांच्या सबलीकरणासाठी काम करण्याची होती. जनसंघाच्या काळात देखील आपलं निवडणुक राजकारणात अस्तित्व अल्प होतं. परंतु तरी आपल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रउभारीणाच्या कामात झोकून देऊन काम केलं आहे.
राज ठाकरे भेट न घेताच मुंबईला का गेले? वसंत मोरेंनी सांगितले कारण
आता पुढील 25 वर्षासाठीचं उद्दिष्ट निश्चित करत आहोत. आता वेळ आली आहे की, भाजपानं पुढील 25 वर्षासाठीचं ध्येय निश्चित करायला हवं. हे ध्येय सर्व अडचणींवर मात करत सातत्याने देशाच्या नागरिकांसाठी काम करत राहणं आणि त्यांच्या आकांक्षांची पुर्तता करणं हे असायला हवं. असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
काॅंग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेची उमेदवारी; वंचितने दिला चर्चेंला पुर्णविराम
दरम्यान, देशात सध्या महागाई, मशिदीवरील भोंगे, ज्ञानव्यापी मशिदीचा, हनुमान चालिसा या मुद्दयांवरून राजकारण तापलं आहे. तसेच राज्यात अनेक राजकीय पक्षाच्या राजकीय सभा होत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांसाठी राजकीय सभांमधून राजकीय चिखलफेक होण्याची शक्यात आहे. तसेच या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहे.
Read also:
- “तूर्तास अयोध्याचा भोंगा स्थगित करून नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू”
- राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित; ब्रीजभूषण सिंहांची पहिली प्रतिक्रिया
- “ठाकरे सरनेम होनेपर भी वो ब्रिजभूषण से डर जायेगा”; राष्ट्रवादीने अयोध्या दौऱ्यावरून मनसेला डिवचलं
- “महिला पोलिसाला धक्का लागला असेल तर राजकारण सोडून देईन”; संदीप देशपांडेंचं खुलं आव्हान
- राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित; ‘या’ कारणांमुळे मनसेने दौरा पुढे ढकलला