मुंबई : महिला पोलिसाला जर धक्का लागला असेल तर आताच्या आता राजकारण सोडून देईन, असं खुलं आव्हान मनसे नेतेे संदीप देशपांडे यांनी केलं आहे. पोलीस त्यांचा शोध घेत होती, परंतु गेल्या 16 दिवसापासून ते पोलिसांपासून फरार होते. कालच त्यांचा उच्च न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यानंतर त्यांनी झालेला प्रकार आज पत्रकार परिषेद सांगितला. तसेच त्यांनी राज्य सरकारवर देखील गंभीर आरोप केलेत.
नवज्योत सिंग सिद्धूला एक वर्षाचा कारवास; ‘या’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालायने सुनावली शिक्षा
आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या खोट्या गुन्हासाठी संपुर्ण महाराष्ट्र पोलीस आम्हाला शोधत होती. मात्र त्या व्हिडीओमधील स्पष्ट फुटेज समाज माध्यमांमुळे जनतेसमोर आले. सरकारविरोधात आमच्या प्रतिक्रिया येऊ नयेत म्हणून राज्य सरकारने हा प्रकार केला. आमचा कायदा आणि न्यायलयावर विश्वास होता. त्यामुळेच आम्हाला न्याय मिळाला. असंही ते म्हणाले,.
“तर आम्ही सर्व फडणवीसांसोबत आहोत”
सरकार त्यांचा असल्याने त्यांच्या मर्जीप्रमाणे आमच्यावर कलम लावण्यात आले. असंही संदीप देशपांडे म्हणाले. तसेच त्यांनी त्यावेळी आमचा धक्का लागला का? असा प्रश्न त्यांनी पत्रकारांना केला . तसेच तुम्ही म्हणालात तर की धक्का लागला. तर संदीप देशपांडे आताच्या आता राजकारण सोडायला तयार आहे. असंही ते म्हणाले. त्यासंबंधी माझ्याकडे काही स्क्रिनशॉट देखील आहेत की, त्या महिलेला माझा काहीही धक्का लागला नाही. असंही ते म्हणाले.
“रोहित पवारांनी महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिकवु नये”; गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांना सल्ला
दरम्यान, पुढे बोलताना ते म्हणाले की, सरकारने आमच्यावर दबाव टाकून हा सर्व प्रकार केला आहे. तसेच राजकीय हेतूने तुम्ही हे सर्व केलात. आज तुमचे दिवस आहेत. उद्या आमचे दिवस येतील. असाही इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. सध्या राज्यात सुडाचं राजकारण सुरू आहे. रात्री बारा वाजता माझ्या घरी पोलीस पाठवत आहेत. महिला पोलिसाला धक्का लागला असेल तर मी राजकारण सोडून देणार. त्यामुळे आतापर्यंत भावना गवळी का समोर आल्या नाहीत. अनिल देशमुख किती दिवस लपून होते? आम्हाला सल्ले देताना तुम्हाला लाज नाही वाटत का ? असा सवाल देखील संदीप देशपांडे यांनी केला आहे.
Read also:
- राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित; ‘या’ कारणांमुळे मनसेने दौरा पुढे ढकलला
- “आमचा गुडलक म्हणून तुम्ही सत्तेत”; नाना पटोलेंचा आदित्य ठाकरेंना टोला
- राज ठाकरे भेट न घेताच मुंबईला का गेले? वसंत मोरेंनी सांगितले कारण
- काॅंग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेची उमेदवारी; वंचितने दिला चर्चेंला पुर्णविराम
- मनसे नेते संतोष धुरी आणि संदीप देशपांडे यांना जामीन मंजूर; न्यायालयाने घातल्या ‘या’ अटी