कल्याण : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याप्रकरणी आज संपुर्ण राज्यात बंदची हाक दिलीय. राज्यातील अनेक शहरात मराठा समाजाकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर अनेक राजकीय संघटनांनी मोर्चे काढत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे.
हेही वाचा…“लाठीहल्ला करण्याचा आदेश देणाऱ्यांना मराठवाड्यात बंदी घाला,” राज ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
जालन्यात आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यच्या निषेधार्थ कल्याणमध्ये मराठा संघटनेकडून आंदोलन करण्यात आला. यावेळी मराठा संघटनेकडून पायाखाली टरबूज तुडवत या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मराठा संघटनांकडून देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं पेटलंय.
हेही वाचा…“दोन्ही उपमुख्यमंत्री किती दिवस तोंड लपवणार ?” विजय वडेट्टीवारांचा खोचक सवाल
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटे गावात बसलेल्या मनोज जरांगे पाटलांची वारंवार वैद्यकीय तपासणी केली जात आहे. तसेच जास्त न बोलण्याचा सल्ला देखील डॉक्टरांनी जरांगे पाटलांना दिलाय. यातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. त्याआधी राज्यातील प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे. तर दुसरीकडे आता सत्ताधाऱ्यांची मुंबईत यासंदर्भात बैठक होत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“..त्यामुळे एका क्षणात राजकारणात प्रवेश केला,” राजकारणात येण्यापुर्वीचा पंकजा मुंडेंनी सांगितला ‘तो’ किस्सा
हेही वाचा…११४ पानाचा लेखी अहवाल सरकारकडे सादर, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या हालचाली सुरू
हेही वाचा…राष्ट्रवादीला अकोल्यात मोठा धक्का, पक्ष फुटीचा ठाकरेंना फायदा, माजी आमदार ठाकरे गटात
हेही वाचा…“लाठीहल्ल्यानंतर अजित पवार नाराज,” बाहेर पडा, बाहेर पडा, सत्तेतून बाहेर पडा, बारामतीत जोरदार घोषणा
हेही वाचा…तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् अजित पवार सत्तेतून बाहेर पडायची भूमिका घेतील का ?