औरंगाबाद : दोन महिन्याच्या राजकीय सुट्टीवर गेलेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे पुन्हा राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी ११ दिवस शिवशक्तीच्या माध्यमातून ज्योतिरलिंग आणि शक्तीपीठांच्या दर्शनासाठी निघाल्या आहेत. यातच आज त्यांनी वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडेंनी राजकारणतल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
हेही वाचा…“दोन्ही उपमुख्यमंत्री किती दिवस तोंड लपवणार ?” विजय वडेट्टीवारांचा खोचक सवाल
मला जीवनात काही कमी नव्हतं. खूप छान आयुष्य होतं. बाबांच्या चेहऱ्यावर उदासी दिसली आणि एका क्षणात राजकारणात प्रवेश केला. चेहऱ्याला ऊन लागायचं नाही, पायाला माती लागायची नाही, मस्त ऐशो-आरामात जीवन होतं, मग बापाच्या चेहऱ्यावर दुख दिसलं. मला माझा पाच वर्षाचा मुलगा म्हणाला, मम्मी बाबा एकटे पटले, तु बाबांसाठी जा. मी शाळा करतो, मी माझं करतो. तु जा. असं तो म्हणाल्यावर मी घराबाहेर पडले. तेव्हापासून आजपर्यंत घराच्या बाहेरच असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं.
हेही वाचा…“महाराष्ट्र द्वेष्ट्या मिंधे- भाजप सरकार..,! अजून किती अन्याय करणार महाराष्ट्रावर?”
दरम्यान, मुंडे साहेब संकटात सापडल्यानंतर त्यांची कन्या असून त्यांची माय झाले. मंत्री झाले, त्यानंतर पाच वर्ष स्वत: च चहा, पोहे देऊन लोकांना बोलावून विकासाचा निधी, ग्रामसभेत योजना, पाणीपुरवठा योजना, बदल्याही ऑनलाईन करत असताना शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन केल्या भ्रष्टाचारमुक्त कारभार केल्यानंतरही अनेकांनी आरोप केले असल्याचंही त्या म्हणाल्या.
READ ALSO :
हेही वाचा…११४ पानाचा लेखी अहवाल सरकारकडे सादर, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या हालचाली सुरू
हेही वाचा…राष्ट्रवादीला अकोल्यात मोठा धक्का, पक्ष फुटीचा ठाकरेंना फायदा, माजी आमदार ठाकरे गटात
हेही वाचा…“लाठीहल्ल्यानंतर अजित पवार नाराज,” बाहेर पडा, बाहेर पडा, सत्तेतून बाहेर पडा, बारामतीत जोरदार घोषणा
हेही वाचा…तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् अजित पवार सत्तेतून बाहेर पडायची भूमिका घेतील का ?
हेही वाचा…“लाठीहल्ला करण्याचा आदेश देणाऱ्यांना मराठवाड्यात बंदी घाला,” राज ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल