मुंबई : अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिमाखात पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्या नगरी सजली असून व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण देखील पाठवण्यास सुरूवात झाले आहे. यातच राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवण्यात आले नाही. यावर आता ठाकरे गटाने आपली भूमिका मांडली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि आमदार सचिन आहिर यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
हेही वाचा…“सावनेरकरांवरील अवकळा अन् पापाचे ओझे गेले”, केदारांना निवडणुक लढवता येणार नाही, देशमुखांनी केदारांना डिवचलं
आम्हाला निमंत्रण येवो अगर न येवो, तो आमच्यासाठी आस्थेचा विषय राहिला आहे. इव्हेंच करणारी जी लोक आहेत, त्यांनी त्या काळात पळपुटेपणा केला. ज्यांना लालकृष्ण अडवाणींची आठवण होत नाही. विश्वहिंदू परिषदेचा उल्लेख होत नाही. अशा लोकांकडून आम्ही काय अपेक्षा करायची? असा खोचक सवाल देखील सचिन अहिर यांनी केलाय. राम मंदिर त्यांनी घडवलेलं नाही. राजकीय पक्ष म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी परखड भूमिका मांडली होती. या विषयाला चालना देऊन सांगितलं होतं की लोकसभेत ते बिल आणा. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर हा तिढा सुटलेला आहे. परंतु आता इव्हेंट करत आहेत. अशी टिका देखील सचिन अहिर यांनी केली.
हेही वाचा..“जितक्या शिंदे गटाला जागा, तितक्या आम्हाला द्या,”अजित पवार गटाची मागणी, भाजपची डोकेदुखी वाढली
दरम्यान, जसं काय यांनीच तिथे जाऊन विटा लावल्या आहेत. आम्हाला अभिमान आहे की राम मंदिर उभं राहतंय. मात्र, आम्हाला आमंत्रण मिळो अथवा न मिळो आम्ही गतवर्षीप्रमाणे तिथे नतमस्तक व्हायला अगोदर तसं भविष्यात जाणार आहोत. जे सांगत आहेत की आम्ही छातीवर बसून राम मंदिर बांधलं आहे. त्यांची ५६ इंची छाती त्यावेळी कुठे होती? जर बाबरी मशीदीवर हल्ला झाला असेल आणि तो माझ्या लोकांनी केला असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. हे सांगण्याचं धाडस आहे का कोणत्या पक्षात? राम मंदिर उभं राहणं हा देशाचा स्वाभिमान आहे. देशाची आस्था आहे. या आस्थेला राजकीय वळण देण्याचं काम होतंय. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…आताच दोन यात्रा झाल्या, त्यातच आता संमेलन, खर्च कसा झेपणार? काॅंग्रेस नेत्यांचे वरिष्ठांकडे गाऱ्हाणे
हेही वाचा..“पक्षांने आदेश दिला तर उद्या निवडणुक लढायला तयार”, रविंद्र धंगेकरांचं लोकसभा निवडणुकीबाबत सुचक विधान
हेही वाचा..बाळा भेगडेंचा वाढदिवस अन् बारणेंचं टेन्शन वाढवणार ; मावळात महायुतीच्याच नेत्यांमध्ये चढाओढ
हेही वाचा…वंचित आघाडीसोबत आली तर जागा किती मिळणार? अशोक चव्हाणांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा.अयोध्येचं निमंत्रण उद्धव ठाकरेंना नाही, पण राज ठाकरेंना मिळालं, भाजपने सेट केला मोठा प्लॅन