नागपूर : नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा प्रकरणी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षाची शिक्षा झाली आहे. त्यानंतर सुनील केदार यांची आमदारकी देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विदर्भात काॅंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. यातच सुनील केदार यांना अटक केल्यानंतर प्रकृती बिघड्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. यावरून आता भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी सुनील केदार यांना डिवचलंय. तसेच सावनेर विधानसभा मतदारसंघातील अवकळा गेली अशी जहरी टिका देखील त्यांनी केली आहे.
हेही वाचा..“अजितदादा खरं बोलले, खासदार शिरूरमध्ये येत नाही”, आढळराव पाटलांची अमोल कोल्हेंवर टिका
कॉग्रेसचे सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांना २२ डिसेंबर २०२३ ला १५० कोटींच्या घोटाळ्यात दोषी ठरवून कोर्टाने ५ वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठावली. लगेच विधानसभेच्या सभापतींनी त्यांना आमदारकीसाठी अपात्र घोषित केल्यामुळे त्यांची आमदारकी गेली. सुनील केदार यांची आमदारकी गेल्यामुळे सावनेरकरांवर आलेली अवकळा आणि पापाचे ओझे गेले. सावनेरच्या जनतेवर सातत्याने होत असलेला अन्याय, भ्रष्टाचारी प्रवृत्ती, गुन्हेगारी वृत्ती आणि दादागिरी त्यानिमित्याने संपुष्टात आली आहे. केदार मागील कित्येक वर्षापासून शासनाला न जुमानता गैरमार्गाने पैसा कमावत होते आणि प्रचंड भ्रष्टाचार त्यांनी आणि त्यांच्या ठराविक दलालांनी पूर्ण विदर्भात पसरविला होता. सुनील केदार ह्यांनी सर्व सामान्य ठेवीदारांचे पैसे बुडवण्याचे पाप उघडपणे केले. शेतकऱ्यांनी घामानी कमावलेल्या पैश्याची सुनील केदार यांनी अक्षरशः लुट केली. सावनेर विधानसभा क्षेत्रातील जनता आणि गरीब शेतकऱ्यांचा त्यांनी प्रचंड विश्वासघात केला. २२ वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेला नागपूर जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक ज्या निर्णयाची वाट पाहत होते, तो निर्णय कोर्टाने दिला. असा टोला देखील आशिष देशमुखांनी केदार यांना लगावला.
हेही वाचा..राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अजितदादांना मोठा धक्का, माजी महापौर ठाकरे गटाच्या गळाला?
पुढे बोलतांना ते म्हणाले की, येणारे दिवस सावनेर विधानसभा क्षेत्राच्या जनतेसाठी, युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी चांगले राहतील आणि विकासाची नवी दालने उघडतील. सावनेर विधानसभा क्षेत्रासाठी नव्या दिशेचा आणि विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. कोर्टाचा आणि सभापतींचा निर्णय जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, जनसामान्यांच्या हिताचा आहे. सुनील केदार यांना शिक्षा झाल्यामुळे आणि त्यांची आमदारकी संपुष्टात आल्यामुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून नव वर्षाच्या नव नांदीला लोकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
हेही वाचा…अजितदादांनी संधी दिली तर कोल्हेंच्या विरोधात निवडणूक लढवणार, विलास लांडे यांचं मोठं विधान
दरम्यान, लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ८(३) नुसार, एखाद्या गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या आणि किमान दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेली व्यक्ती संसद सदस्य किंवा विधानसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरते. 10 जुलै 2013 रोजी सुप्रीम कोर्टाने लिली थॉमस विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या खटल्याचा निकाल देताना असा निर्णय दिला की, कोणताही खासदार, आमदार किंवा विधान परिषद सदस्य (MLC) ज्याला गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले आहे आणि त्याला किमान दोन वर्षांची कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे, तात्काळ प्रभावाने सभागृहाचे सदस्यत्व गमावेल. जर दोषसिद्धीवर स्थगिती नसेल तर, लोकप्रतिनिधी कायद्याच्या तरतुदींनुसार सदस्यास तात्काळ प्रभावाने अपात्र ठरवले जाईल. याबाबत स्पीकरला अधिसूचना जारी करावी लागते. पाच वर्षांची शिक्षा पूर्ण होऊनही केदार आणखी सहा वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.
…अखेर सावनेरची दादागिरी संपुष्टात !
कॉग्रेसचे सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांना २२ डिसेंबर २०२३ ला १५० कोटींच्या घोटाळ्यात दोषी ठरवून कोर्टाने ५ वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठावली. लगेच विधानसभेच्या सभापतींनी त्यांना आमदारकीसाठी अपात्र घोषित केल्यामुळे त्यांची… pic.twitter.com/EGeGDGhOyH
— Dr. Ashishrao R. Deshmukh (@AshishRDeshmukh) December 24, 2023
READ ALSO :
हेही वाचा..“जितक्या शिंदे गटाला जागा, तितक्या आम्हाला द्या,”अजित पवार गटाची मागणी, भाजपची डोकेदुखी वाढली
हेही वाचा..“घरात बसून थोडचं राजकारण करता येईल”, छगन भुजबळांचा उद्धव ठाकरेंना टोला
हेही वाचा…“लोकसभेत उद्धव ठाकरेंनी एक तरी खासदार निवडून आणून दाखवावा”, गिरीश महाजन यांचं खुलं चॅलेंज
हेही वाचाकाल चॅलेंज दिलं, आज थेट मतदारसंघात दाखल, अजिदादांच्या भूमिकेनंतर कोल्हे शरद पवारांच्या भेटीला, म्हणाले..
हेही वाचा…ट्रॅक्टर, ट्रॅक १० लाख वाहनं, ३ कोटी मराठे, सोबत तेल-मीठ, तेल..; असा असणार जरांगे पाटलांचा मुंबई दौरा