जळगाव : लोकसभेच्या महाराष्ट्रातील सर्वच जागा आम्ही जिंकू, कारण राज्यात आणि देशात मोदींचं वलय आणि जादूचं अशी आहे. सगळ्याच क्षेत्रात देश प्रगती करीत आहे. जगमान्य मोदींचं नेतृत्व असून सगळ्यांचाच विश्वास त्यांच्यावर आहे. अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप कुठेच येणार नाही असं सांगितलं होतं. तसेच उत्तर प्रदेशाच्या बाबतीतही तसंच झालं. गेल्या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे यांचे १८ खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यामुळे निवडून आले होते. यंदा त्यांनी लोकसभेत एक तरी खासदार निवडून आणून दाखवावा, असं खुलं आव्हान गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना दिलंय.
हेही वाचा..कोल्हेंना निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणार, अजिदादांची घोषणा ; शिरूरसाठी कोल्हेंच्या विरोधात अजिदादांचा ‘हा’ शिलेदार तयार
पुढे बोलतांना गिरीश महाजन म्हणाले की, राज्यात ज्यांनी बंडाळी केली, धोके केले, ते सर्व बाजूला झाले आहेत. त्यांचं काही राहिलेलं नाही. ज्यांनी आमच्याशी द्रोह केला, त्यांनी लोकसभेची एक जागा तरी जिंकून दाखवावी, असं खुलं चॅलेंज मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे यांना दिलं आहे. मागच्या सर्व्हेत देखील भाजप कुठेच येत नाही. असं दाखवण्यात आलं, परंतु मोदींची जादू अजूनही कायम आहे. टक्केवारीवर जाऊ नका. ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळेस मोदींवरील नेतृत्व दिसून येईल.
हेही वाचा…“केंद्राची कीड आता राज्यालाही लागली, भाजप सरकारला निलंबनाचा रोग झालाय,” कुणी केली टिका?
दरम्यान, देशात झालेल्या पाच विधानसभा निवडणुकीत जनतेने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विकास कामांवर शिक्कामोर्तब केला आहे. या राज्यात मिळालेले यश हे चांगले असून मोठ्या अंतराने भाजपाने तीन राज्यात विजय मिळवला आहे. तेलंगणा राज्यात पक्षाची संघटना आणि या राज्यात भाजपचे कामही नव्हतं. तरी यश मिळालं आहे. पुढच्या वेळी तेलंगणातही काम करून हे राज्यही भाजपामय करण्याचा प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचाकाल चॅलेंज दिलं, आज थेट मतदारसंघात दाखल, अजिदादांच्या भूमिकेनंतर कोल्हे शरद पवारांच्या भेटीला, म्हणाले..
हेही वाचा…ट्रॅक्टर, ट्रॅक १० लाख वाहनं, ३ कोटी मराठे, सोबत तेल-मीठ, तेल..; असा असणार जरांगे पाटलांचा मुंबई दौरा
हेही वाचा..“अजितदादा खरं बोलले, खासदार शिरूरमध्ये येत नाही”, आढळराव पाटलांची अमोल कोल्हेंवर टिका
हेही वाचा..राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अजितदादांना मोठा धक्का, माजी महापौर ठाकरे गटाच्या गळाला?
हेही वाचा…अजितदादांनी संधी दिली तर कोल्हेंच्या विरोधात निवडणूक लढवणार, विलास लांडे यांचं मोठं विधान