वर्धा : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काॅंग्रेसने राज्यात विशेष लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. यातच २८ डिसेंबर रोजी काॅंग्रेसचे राष्ट्रीय संमेलन नागपुरला होत असून त्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. हम तय्यार है या नावाने होत असलेल्या संमेलनाच्या तयारीसाठी अलिकडेच एक महत्वाची बैठक पार पडली. आता दोन प्रदेश समितीच्या दोन यात्रा झाल्या. आता या संमेलनाचा खर्च कसा करणार? लोकांची गर्दी कशी जमवणार असा सवाल अनेकांनी या बैठकीत केलाय.
हेही वाचा..“जितक्या शिंदे गटाला जागा, तितक्या आम्हाला द्या,”अजित पवार गटाची मागणी, भाजपची डोकेदुखी वाढली
राष्ट्रीय काॅंग्रेसचे संमेलन यावर्षी नागपुरला आयोजित करण्यात आलं आहे. यासाठी काॅंग्रेसने राष्ट्रीय सचिवांकडे याची जबाबदारी सोपवली आहे. तर राज्यातील अनेक नेत्यांकडे याची जबाबदारी सोपविण्यात आली असून मोठी तयारी करण्यास सांगण्यात आले आहे. यातच रॅलीचे प्रभारी बी.एम. संदीप तसेच जिल्हा प्रभारी झिया पटेल यांनी घेतलेल्या बैठकीत सभेत गर्दी जमा करण्याची बाब खर्चिक असल्याचे सर्वांनी स्पष्ट केले.
हेही वाचा..“घरात बसून थोडचं राजकारण करता येईल”, छगन भुजबळांचा उद्धव ठाकरेंना टोला
कार्यकरत्यांचा नाश्ता, भोजन, हा खर्च आहेच. तोण आणणार कुठून? असा सवाल करताच बैठकीत काही काळ शांतता परसली. तसेच मार्ग काढायचा कसा? असा पेच पडताच काहींनी यावर उत्तर शोधले. स्थानिक नेते विधानसबा निहाय काही खर्च करतील. तर खर्चाचा काही भार वरिष्ठांनी उचलावा. आताच प्रदेश समितीच्या दोन यात्रा झाल्या. त्याचा खर्च होत नाही तोच हे संमेलन आले. कसे झेपणार? असा प्रश्न देखील यावेळी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला.
दरम्यान, पदाधिकाऱ्यांनी खर्चाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर प्रभारी नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर बोलावे लागणार असं सांगून सभा आटोपती घेतली. यावेळई आमदार रणजीत कांबळे, माजी आमदार अमर काळे, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, प्रदेश समितीचे बंडोपंत टेंभूर्ण, शैलेश अग्रवाल, जिल्ह्याध्यक्ष मनोज चांदूरकर, महिला काॅंग्रेसच्या हेमलता मेघे उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा..“पक्षांने आदेश दिला तर उद्या निवडणुक लढायला तयार”, रविंद्र धंगेकरांचं लोकसभा निवडणुकीबाबत सुचक विधान
हेही वाचा..बाळा भेगडेंचा वाढदिवस अन् बारणेंचं टेन्शन वाढवणार ; मावळात महायुतीच्याच नेत्यांमध्ये चढाओढ
हेही वाचा…वंचित आघाडीसोबत आली तर जागा किती मिळणार? अशोक चव्हाणांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा.अयोध्येचं निमंत्रण उद्धव ठाकरेंना नाही, पण राज ठाकरेंना मिळालं, भाजपने सेट केला मोठा प्लॅन
हेही वाचा…“सावनेरकरांवरील अवकळा अन् पापाचे ओझे गेले”, केदारांना निवडणुक लढवता येणार नाही, देशमुखांनी केदारांना डिवचलं