पुणे : आगामी निवडणुकीत लोकसभेच्या ४८ जागांच्या तयारीला लागा असे आदेश वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यावरून आता पुढील निवडणुका वंचित स्वबळावर लढणार असे संकेत प्रकाश आंबेडकर यांच्याकडून दिले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर वंचितला आपल्यासोबत घेण्यात यावं, अशी बोलणी मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे केली असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलतांना दिलीय. त्यावर आता काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा..काल चॅलेंज दिलं, आज थेट मतदारसंघात दाखल, अजिदादांच्या भूमिकेनंतर कोल्हे शरद पवारांच्या भेटीला, म्हणाले..
इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक पार पडली, तेव्हा काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी यांच्याशी वंचित बहुजन आघाडीबाबत चर्चा केली होती. त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांना आपल्यासोबत घ्यायला हवं, असं खर्गे यांना सांगितलं आहे. परंतु लोकशाहीमध्ये निर्णय घेण्याचा प्रत्येकाला आहे. यावर आता अजून पुढे पाहू? अशी प्रतिक्रिया देखील शरद पवार यांनी वंचितच्या युतीबाबत दिली आहे.
हेही वाचा…ट्रॅक्टर, ट्रॅक १० लाख वाहनं, ३ कोटी मराठे, सोबत तेल-मीठ, तेल..; असा असणार जरांगे पाटलांचा मुंबई दौरा
वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबाबत मी व्यक्तीगत पातळीवर सकारात्मक आहे. पण २९ तारखेच्या बैठकीत इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. त्यावेळेस वंचित बाबतंही चर्चा होणार आहे. २९ तारखेच्या बैठकीत वंचितला सोबत घेतल्यास किती जागा द्यायच्या याबाबतंही चर्चा होणार आहे. वंचितला सोबत घेतलं तर राज्यातील मतांचं विभाजन टाळता येईल, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा..“अजितदादा खरं बोलले, खासदार शिरूरमध्ये येत नाही”, आढळराव पाटलांची अमोल कोल्हेंवर टिका
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत दोन तृतीयांश बहुतम मिळालं पाहिजे. यासाठी पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र ही राज्ये महत्वाची आहेत. अन्य राज्यांत आपल्याला काम करता येणार नाही. पण महाराष्ट्रात काम करता येईल. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणकीत हे एकत्र आले नाही तर आम्हाला ४८ जागा स्वबळावर लढवाव्य लागतील. असं वक्तव्य वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल केले. साने गुरूजी यांच्या जंयतीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या संविधान निर्धार सभेत कार्यकर्त्यांना त्यांनी काही सुचना देखील केल्या. यावरून आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार? ते पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा.अयोध्येचं निमंत्रण उद्धव ठाकरेंना नाही, पण राज ठाकरेंना मिळालं, भाजपने सेट केला मोठा प्लॅन
हेही वाचा…“सावनेरकरांवरील अवकळा अन् पापाचे ओझे गेले”, केदारांना निवडणुक लढवता येणार नाही, देशमुखांनी केदारांना डिवचलं
हेही वाचा..“जितक्या शिंदे गटाला जागा, तितक्या आम्हाला द्या,”अजित पवार गटाची मागणी, भाजपची डोकेदुखी वाढली
हेही वाचा..“घरात बसून थोडचं राजकारण करता येईल”, छगन भुजबळांचा उद्धव ठाकरेंना टोला
हेही वाचा…“लोकसभेत उद्धव ठाकरेंनी एक तरी खासदार निवडून आणून दाखवावा”, गिरीश महाजन यांचं खुलं चॅलेंज