मुंबई : देशात सध्या गाजत असलेल्या लव जिहादचा आपण लवकरच खात्मा करणार असून आपल्याला जेलमध्ये टाकणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडली आहे. ही तर सुरूवात आहे, पिक्चर तो पुरी बाकी है असं म्हणत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. यावरून शिवसैनिक नवनीत राणा यांच्यावर चांगलेच संतापले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या प्रवक्त्या संजना घाडी यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.
“शिवसेना, शिंदे गट की मनसे, बघू कोणाचा मेळावा मोठा होतो”
त्या पुढे म्हणाल्या की, नवनीत राणा ह्या सी ग्रेड फिल्ममध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्या आहेत. एक आमदार आपल्यावर भाळला आणि त्यांनी आपला चंचू प्रवेश राजकारणात करून घेतला. हनुमानाला हनुमान का म्हणतात? याचं साधं उत्तर त्यांना एका मुलाखतीमध्ये देता आलं नाही आणि म्हणे मी हनुमान भक्त असल्याचं सांगत फिरत आहेत. भाजपच्या सी डी टीम म्हणून काम करणाऱ्या मनसेने भोंग्यांच्या विषयासाठी मशिदीसमोर हनुमान चालीसा वाच म्हणून सांगितलं. त्यानंतर त्यांनी डायरेक्ट मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचायला निघाली. ज्या बाईला लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेलं मातोश्री या मंदिरातला आणि मशिदीतला फरक कळत नाही त्या बाईला आणखी कशी वागणुक मिळालला पाहिजे होती.
“दया, कुछ तो गडबड है”; नरेश म्हस्केंनी अजित पवारांना डिवचलं
त्या म्हणत आहेत की शिवसेनेने काॅंग्रेस, राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली म्हणून मातोश्री आणि मातोश्रीचे विचार हिंदुत्ववादी राहिले नाहीत. बाळासाहेबांचे राहिले नाहीत. पऱंतु याच मातोश्रीवर बाळासाहेबांनी मुस्लिम कुटुंबीयांना त्यांची नमाजाची वेळ झाल्यानंतर नमाज अदा करण्याची विनंती केली होती आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थिती नमाज अदा केली होती. हे तुमच्यासारख्या मुंबईची मुलगी म्हणून घेणाऱ्या बाईला माहिती पाहिजे. ही मुंबईची मुलगी कदाचित त्यावेळी सी ग्रेड फिल्म करण्यात बिझी होती. आणि आता फड उभा करून कमळाबाईची सुपारी वाजवते. हे महाराष्ट्रा आणि मुंबईला पक्के कळाले आहे. असा इशाराही त्यांनी राणांना दिला.
“आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक माना अन्..”; फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आव्हान
दरम्यान, कावळीणीच्या शापाने गाय मरत नसते बाई..! त्यामुळे माझ्या शापामुळे माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे शिवसेनेला कार्यकर्ता उरला नाही अशा फाजील वल्गना करून थेर महाराष्ट्राला दाखवू नका. शिवसेना ही कालही मजबूत होती आजही मजबूत आहे आणि तुमच्यासारख्या 100 दुश्मनांच्या छाताडावर उभी राहून पुन्हा एकदा या मुंबई महाराष्ट्रावर आपला भगवा डौलाने फडकत ठेवणार आहे. कितीही शूर्पणखा अंगावर आल्या तरी त्यांची नाक कापून. असं ही त्या म्हणाल्या.
Read also
- अमित शहा मुंबईत, भाजपचे सर्व नेते उपस्थित, पंकजा मुंडे गायब? राजकीय वर्तुळात चर्चा
- शिक्षकांवर आरोप करणारा आमदार पोहचला थेट शाळेत, खिचडीवर ताव मारला अन्….
- “गणपतीने अमित शहांना सद्बुद्धी द्यावी, त्यांनी देशासाठी काम करावं, देश विकण्यासाठी नाही”
- “आम्ही पाठवलेली यादी रद्द केली, अन् इडी सरकार येताच..;” नाना पटोलेंचा राज्यपालांवर निशाणा
- “तुम्ही काय आम्हाला जमीन दाखवणार, आम्हीच तुम्हाला जमिनीवर आणू”