पुणे : कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असला तरीही ईव्हीएमविषयी आमच्या भूमिका कायम आहेत. बॅलेट पेपर, मतपत्रिका हाच लोकशाही सिध्द करण्याचा मार्ग आहे. आता तुम्ही म्हणाल की कर्नाटकात जिंकलात, आम्ही महाराष्ट्रातही जिंकू. पण इव्हीएमसंदर्भात आमची मागणी कायम आहे. आम्हाला बॅलेटपेपरवरच देशभरात निवडणुका हव्या आहेत.अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे.
हेही वाचा…कर्नाटकात भाजपचा मोठा पराभव, मोदी अन् शहांनी दिल्या प्रतिक्रिया, म्हणाले, कर्नाटकाचा निकाल,,,,,
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा काॅंग्रेसने दारून पराभव केला. विधानसभेच्या २२४ विधानसभा मतदारसंघापैकी काॅंग्रेसने १३६ मतदारसंघावर आपले उमेदवार निवडून आणले आहेत. त्यामुळे कर्नाटकात लवकरच काॅंग्रेसचं सरकार स्थापन होणार आहे.
हेही वाचा…“कर्नाटकच्या मतदारांनी भाजपच्या डोक्यात बजरंगबलीच्याच गदेने जोरदार प्रहार केला”
याच पार्श्वभूमीवर बोलतांना राऊत म्हणाले की, तुंबवून ठेवलेल्या निवडणुका घ्याव्यात. कधीही घ्या, पण तुमची हिमंत नाही. यांना देशात कोणत्याही निवडणुका घ्यायच्या नाहीत. कर्नाटकच्या निकालानंतर यांना जो हादरा बसला आहे. यामुळे खऱ्या अर्थाने देशात हुकूमशाही सुरू होईल का? अशी आम्हाला भीती वाटते. यामुळे या ना त्या कारणामुळे महापालिका निवडणुकांपासून विधानसभा, लोकसभा पुढे ढकलत राहायचं अशाप्रकारे दिल्लीतील सरकार निर्णय घेऊ शकतं. याला हूकूमशाही म्हणतात. अशी प्रतिक्रियाही राऊतांनी दिली.
READ ALSO :
हेही वाचा…“एक लेटर बॉम्ब अन् भाजपमध्ये प्रवेश, सुळेंचा निकवर्तीय, राष्ट्रवादीचा माजी आमदार उद्या भाजपमध्ये जाणार”
हेही वाचा…कुरूलकरांचा थेट पाकिस्तानी तरूणीशी संबंध, ? ‘झारा दासगुप्ता’ नावाने बनावट खातं, नवी माहिती समोर
हेही वाचा…“कारवाईला घाबरत नाही, लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला”, राऊतांनी सरकारला डिवचलं
हेही वाचा…पुण्याचा शहाराध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत ठरणार, १८ मे रोजी पक्षांची कार्यकारिणी बैठक
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंसोबत जाऊन मी एक सट्टा खेळलो”, गुलाबराव पाटलांंचं मोठं वक्तव्य