जळगाव : महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं अन् राज्यात सत्तासंत्तातर झालं. यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांवर पन्नास खोके अन् एकदम ओक्के अशी म्हण पडली. विरोधी पक्षांकडून सातत्याने शिंदे गटाच्या आमदारांवर टिका टिप्पणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावरून पलटवार केला आहे.
हेही वाचा…“एकत्र लढलो तर राज्यात आघाडीची सत्ता येईल”, कर्नाटकच्या निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
हे मंत्रीपद मला सहज मिळालं नाही. १५ ते २० वेळा मी जेलमध्ये गेलो होतो. शिंगाडे मोर्चा म्हणून गुलाबराव पाटील हा महाराष्ट्रात फेमस होता. सर्व आयुष्य मी संघर्षात घातलं. त्यावेळेस मी सत्तेची लालसा केली नाही. मी तर मंत्रीपद सोडून गेलो होतो. माझी आमदारकीही गेली असती. एकनाथ शिंदेंसोबत जाऊन मी एक सट्टा खेळलो, हिंदूत्वासाठई मी सट्टा खेळलो. भगवा झेंडा वाचवण्यासाठी मी आम्ही भाजपसोबत गेलो अस गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“मोदी-शहांच्या बळजबरी सत्तेच जोखडं कर्नाटकच्या जनतेनं निर्भयपणे फेकलं”, ठाकरेंचा हल्लाबोल
सत्ता समीकरण बदलण्यासाठी आधीच जळगाव जिल्ह्यातील पाच आमदार गेले होते. त्यापैकी चैर आमदार माझ्याही पहिले पळून गेले होते. नागपुरचाही पळून गेला. बुलढाण्याचाही पळून गेला. जळगावचे गेले, नाशिकचे गेले, दादर ठाण्याचे सर्वच आमदार शिंदेंसोबत पळून गेले. मग माझ्यावरती झाडी, डोंगर, खोके अशी जहरी टिका होत गेल्या. असंही ते म्हणाले.
हेही वाचा…“अन् राष्ट्रवादीचा उमेदवार पॅक करून महाराष्ट्रात पाठवला,” फडणवीसांचा शरद पवारांना खोचक टोला
पुढे बोलतांना गुलाबराव पाटील म्हणाले की, मी गेलो नसतो तर शिंदे आणि फडणवीस यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास ज्या प्रकारे होत आहे. तो झाला नसता. मात्र मी एकटाच मूळ ट्रकवर आलो आहे. १९८७ मध्ये मी शिवसैनिक झालो. बाळासाहेबांनी शिवकल्याप्रमाणे शिवसेनेसाठी काम केले. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…कर्नाटकात भाजपचा मोठा पराभव, मोदी अन् शहांनी दिल्या प्रतिक्रिया, म्हणाले, कर्नाटकाचा निकाल,,,,,
हेही वाचा…“कर्नाटकच्या मतदारांनी भाजपच्या डोक्यात बजरंगबलीच्याच गदेने जोरदार प्रहार केला”
हेही वाचा…“कर्नाटकातल्या जनतेने बंडखोरांना धडा शिकवला, भाजपात गेलेले १८ बंडखोर उमेदवार पराभूत”
हेही वाचा…“कर्नाटक में नफरत का बाजार बंद हुआ और मोहब्बत की दुकान खुली है”, राहुल गांधी
हेही वाचा…“कर्नाटकच्या जनतेने भाजपच्या ‘खरेदी विक्री’च्या धोरणाला मुठमाती दिली,” राष्ट्रवादीने डिवचलं