मुंबई : महाराष्ट्राच्या सध्याच्या सरकारने नेमलेला गटनेता बेकायदेशीर आहे. या प्रकरणात राज्यपालांनी केलेली संपुर्ण प्रक्रिया बेकायदेशीर आहे. तसेच सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ज्या विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला आहे. ते देखील बेकायदेशीर आहे. त्यामुळे बेकायदेशीर सरकारचे आदेश प्रशासनानं पाळू नयेत. असं म्हटल्यानंतर खासदार संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावर आता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“कर्नाटक में नफरत का बाजार बंद हुआ और मोहब्बत की दुकान खुली है”, राहुल गांधी
नाशिक पोलिसांनी माझ्याविरोधात भा. द.वि. कलम ५०५ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सरकारचे गठन बेकायदेशीर ठरले आहे. व्हिपपासून शिंदे यांना गटनेतेपदी निवड करण्यापर्यंत सगळेच घटनाविरोधी ठरवले आहे. असंही राऊतांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“कर्नाटकच्या जनतेने भाजपच्या ‘खरेदी विक्री’च्या धोरणाला मुठमाती दिली,” राष्ट्रवादीने डिवचलं
१६ आमदार कोणत्याही क्षणी अपात्र ठरविले जातील अशी स्थिती आहे. बेकादेशीर सरकारचे आदेश प्रशासनानं पाळू नयेत. भविष्यात खटले दाखल होतील. असे मत व्यक्त केले. हा अपराध आहे का ? सरकारने थेट गुन्हाच दाखल केला. मी कारवाईला घाबरत नाही. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला आहे. या हुकूमसाही प्रवृत्तीशी लढावेच लागेल. असंही राऊतांनी सांगितलं आहे.
नाशिक पोलिसांनी माझ्या विरोधात भा. द. वि. कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर सरकारचे “गठन”बेकायदेशीर ठरले आहे . व्हिप पासून शिंदे यांना गटनेते पदी… pic.twitter.com/I3jqIT8BuH
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 15, 2023
READ ALSO :
हेही वाचा…पुण्याचा शहाराध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत ठरणार, १८ मे रोजी पक्षांची कार्यकारिणी बैठक
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंसोबत जाऊन मी एक सट्टा खेळलो”, गुलाबराव पाटलांंचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…कर्नाटकात भाजपचा मोठा पराभव, मोदी अन् शहांनी दिल्या प्रतिक्रिया, म्हणाले, कर्नाटकाचा निकाल,,,,,
हेही वाचा…“कर्नाटकच्या मतदारांनी भाजपच्या डोक्यात बजरंगबलीच्याच गदेने जोरदार प्रहार केला”
हेही वाचा…“कर्नाटकातल्या जनतेने बंडखोरांना धडा शिकवला, भाजपात गेलेले १८ बंडखोर उमेदवार पराभूत”