मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राज्यात आता भाजपला सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर भाजपची काल राष्ट्रीय कार्यकारणी सभा पार पडली. यामध्ये महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. अशातच नाराज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे ठेवण्यासाठी शिवसेनेकडून पक्ष मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. यामध्ये आदित्य ठाकरे आता आक्रमक भूमिकेत दिसत आहे. यावरून सदाभाऊ खोत यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
“राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या मदतीला धावुन आलं पाहिजे”; रूपाली पाटील
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जहरी टिका केली. ते म्हणाले की पर्यावरण मंत्री म्हणून माझं हेच काम होते. राज्यात कोठेही घाण साचू नये आणि ती घाण गेलेली आहे याचा आनंद आहे. आता यावर रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांनी आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे तुम्ही घरातल्या सोन्यासारख्या माणसांना गमावणे ह्याला घाण स्वच्छ करणे म्हणत असाल तर तुमच्या बुद्धीची कीव येते. विनाशकाले विपरीत बुद्धी असंही सदाभाऊ खोत म्हणाले.
“बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा अन् धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय”;
राज्यात कोठेही घाण साचू नये आणि ती घाण गेलेले आहे याचा आनंद आहे, असं आदित्य ठाकरे म्हणताहेत. मात्र तुम्ही धान्य निवडून त्यातले खडे बाहेर फेकायचे असतात. तुम्ही आघाडी सरकार स्थापन करुन खडे तेवढे घरात आणले. असा टोला सदाभाऊंनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे. आदित्य ठाकरे यांची काल कर्जतला शिवसेनेची सभा पार पडली. त्या सभेत त्यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर कडाडून टिका केली.
आता तर विठ्ठलाची महापुजा ‘उद्धव ठाकरेचं’ करणार; SC च्या निकालानंतर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया
दरम्यान, दिपाली सय्यद आणि मनसेच्या नेत्या शालीनी ठाकरे यांच्या नेहमी राजकारणांवरून टिका टिप्पणी केली जाते. स्वत: च्या पक्षात केमिकल लोच्या कधी झाला, हे कलानगरच्या सर्किटला समजलेच नाही. असं म्हणत मनसेच्या नेत्या शालीनी ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. तर जे आम्हाला सोडून गेले, ते आमच्यासाठी मेले. असे ठणकावणाऱ्या आमच्या साहेबांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. नाहीतर हे. एकिकडे सैनिक रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे पक्षप्रमुखांसहीत संपुर्ण परिवार गुपचुप बंडखोरांच्या मनधरणीचे सर्व प्रयत्न करत आहेत. असं मनसेचे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं होतं.
Read also:
- “बेडकाच्या डबक्यात भाजपने उतरू नये, नाहीतर फडणवीस, मोदींची अप्रतिष्ठा होईल”
- “कारकुनच्या पदावरून उचलून राजसाहेबांनी सामानाचा संपादक बनवला”; मनसेचा राऊतांना टोला
- “मनसे हा पक्ष नसून डिपॉझिट जप्तची मशिन”; दिपाली सय्यद यांनी मनसेला पुन्हा डिवचलं
- “एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं; बंडखोर आमदार दिपक केसरकर
- “राज्य सरकारचा पाठिंबा कोर्टात नाही तर राज्यपालांकडे जाऊन सांगायचा असतो”; जयत पाटलांचा शिंदेंना टोला