मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा राजकीय परिस्थितीबाबत भाष्य़ केलं आहे. राज्यात सध्या शिवसेनेचे 39 आमदार सरकार सोबत नाहीत. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून शिवसेनेच्या काही आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे सरकार अल्पमतात आले असून त्यांनी राज्यापालांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. त्यानंतर राज्यापालांनी राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे सांगण्यात आले आहेत.
“भूल थापांना बळी पडू नका, आजही तुमची काळजी वाटते, मुंबईत या” उद्धव ठाकरे
बंडखोर आमदारांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून जोरदार टिकास्त्र होत आहेत. तसेच तुम्ही आसाममध्ये थांबले आहेत तर आसाममधील पुरग्रस्त लोकांना मदत करा असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिला होता. त्यावर आता बंडखोर आमदारांनी आसाम येथील पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री साहाय्य निधीत 51 लाखांची मदत एकनाथ शिंदे यांच्या गटाने केली असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
राज्याच्या सत्तानाट्यात टर्निंग पॉईंट, भाजपने राज्यपालांना दिले ‘हे’ पत्र
तसेच मुंबई येथील कुर्ला परिसरातील एक इमारत कोसळून जवळपास 19 लोकांचा जीव गेला आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाना प्रत्येकी 5 लाख आणि जखमींना 1 लाख रूपये मदत एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. तसेच शिवसेनेच्या 80 टक्के समाजकारणाचा विचार पुढे नेणारा हा निर्णय असं देखील उदय सामंत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून बंडखोर आमदारांवर होत असलेल्या आरोपांवर चांगलाचं प्रत्युत्तर दिलं आहे.
राजकीय गोंधळातही उद्धव ठाकरेंचा नवी मुंबई विमानतळाबाबत मोठा निर्णय
बंडखोर आमदार मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भावनिक आवाहान साद घालतील, असं चित्र सध्या दिसत नाही. कारण उद्धव ठाकरे एका बाजूला समेटाची हाक देतात आणि दुसऱ्या बाजूला खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे वेगवेगळ्या उपमा देऊन आमच्यावर आरोप करताहेत. असा सवाल बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. तसेच काल देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय अस्थिततेबाबत राज्यपालांना पत्र पाठवले असून त्यावर राज्य सरकारला बहुमत चाचणी करण्याचे तात्काळ आदेश दिले आहेत. एकनाथ शिंदे गटाचे आमदार हे गोव्यामध्ये ‘ताज कनेक्शन’ या हॉटेलमध्ये थांबतील. त्याठिकाणी 71 रुम बुक करण्यात आलेल्या आहेत आणि खाजगी विमानाने ते सर्व आमदार 4.30 वाजताच्या दरम्यान गोव्यात पोहोचतील.
Read als
- गोव्यामध्ये ‘ताज कनेक्शन’; बंडखोर आमदारांना गुवाहाटीहून गोव्याला नेण्यासाठी स्पाईंसजेटचे विमान रवाना
- आमदारांनो उद्या सकाळपर्यंत मुंबईत या..! भाजपच्या सर्व आमदारांना वरिष्ठांकडून फोन
- “एका बाजुला डुकरं, रेडा, कुत्रा, नाल्याची घाण म्हणायचं अन् दुसऱ्या बाजूला समेटची हाक द्यायची”
- “राजकीय अस्थिरता असताना सरकारने एकाच वेळी 160 जीआर काढले”; भाजपचं राज्यपालांना पत्र
- ” जे आरोप करीत आहेत, ते अगोदर राष्ट्रवादीमध्येच होते”; सुप्रिया सुळेंचा बंडखोर आमदारांवर निशाणा