मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना बारामती अॅंग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी आज पुन्हा इडीकडून चौकशी करण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळ्याप्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने २० जानेवारी रोजी दुसऱ्यांदा विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला. त्यामुळे अजित पवार यांच्यासह ७० जाणांना पुन्हा एकदा क्लीनचीट देण्यात आली आहे. त्यावरून आता विरोधी पक्षातील नेत्यांनी यावर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…सोलापुर अन् धुळ्यात एकाच वेळी ठाकरे गटाचं मोठं नुकसान, असंख्य पदाधिकारी शिंदे गटात दाखल
बारामती अॅग्रो कंपनी कारखाना गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांची आज दुसऱ्यांदा इडीकडून चौकशी करण्यात येत आहे. ईडीच्या कार्यालयात जाण्याआधी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रोहित पवारांच्या बाजूने जोरदार घोषणा दिल्या. यावेळी रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. १ तारखेला मला परत बोलावलं आहे. जी माहिती त्यांनी मागवली आहे ती माहिती मी दिलेली आहे. १ तारखेला अतिरिक्त माहिती मागवलेली आहे. तीही मी देणार आहे. मी आधी व्यावसायात आलो मग राजकारणात आलो . काही लोक आधी राजकारणात आले आणि नंतर व्यावसायात आले. आम्ही कधी त्यांना प्रश्न केला नाही. मग त्यांनी का आम्हाला प्रश्न करायचा ? असा सवाल देखील रोहित पवारांनी यावेळी उपस्थित केला.
हेही वाचा…मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक, झारखंडमध्ये मोठा राजकीय भूकंप
दरम्यान, आज एका वर्तमानपत्रात एका बाजूला झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीनचिट दिली आहे. यावरून आज पेनच्या सभेतून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाजपवर जोरदार टिका केली.
READ ALSO :
हेही वाचा…“रायगडमध्ये यावेळी मोदींविरोधात त्सुनामी सारखं मतदान होणार”, ठाकरेंनी सुनील तटकरेंना दिलं आव्हान
हेही वाचा…“३० गद्दार माजी नगरसेवकांना प्रत्येकी ५ कोटी रूपये विकासनिधी,” ठाकरे गटाची जोरदार टिका
हेही वाचा…गृहमंत्री फडणवीसांचा पुण्यात ‘नवा नागपुर पॅटर्न’, अजित पवारांना पुण्यात धक्का ?
हेही वाचा…कुख्यात गुंड शरद मोहोळचा मुख्य मारेकरी अखेर अटकेत, नाशिक रोडवर पाठलाग करत पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हेही वाचा…“आमच्यावर शिंतोडे उडवण्याचे काही ‘इंसेंटिव्ह’ जाहीर केले आहे का शेठजींनी,”? दानवेंचा शेलारांचा खोचक सवाल