पुणे : देशातील सर्वात मोठा वेदांतने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीसह भागीदारी केली असून या माध्यामातून महाराष्ट्रात तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित होते. मात्र हा प्रकल्प आता गुजरातला गेल्याने राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी सत्ताधारी पक्षांवर जहरी टिका केली आहे. त्यामुळे आता याप्रकरणावरून भाजप आणि विरोधकांमध्ये खडाजंगी बघायला मिळत आहे.
“सांग सांग भोलानाथ हा बालिश प्रश्न शेलारांनी मुनगंटीवारांना विचारला पाहिजे”; सेनेचं प्रत्युत्तर
बिनकामी बोंबा मारणारे भाजप नेते महाराष्ट्रातील रोजगार प्रकल्प गुजरातला पळवला, म्हणून आवाज उठवणार का ? असा सवाल रूपाली पाटील यांनी शिंदे सरकारला केला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राला न्याय देणार का ? आता पाहू किती प्रेम, आस्था, कळवळा आहे यांना आपल्या महाराष्ट्रावर आणि आपल्या लोकांवर, आता दाखवून द्या रे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
“आरती सिंग दर महिन्याला वसुली करून पैसे ठाकरेंपर्यंत पोहोचवायच्या”; रवी राणांचा गंभीर आरोप
शिंदे फडणवीस सरकार आपल्या महाराष्ट्रातील 1 लाख लोकांचा रोजगार प्रकल्प आपण गुजरातला दिला. तुमच्या केंद्र सरकारच्या लाचारीला मानले. महाराष्ट्रातील बेरोजगार बंधू, भगिनींनो वाटा पेढे, लावा साऊंड, जल्लोष साजरा करू आपले वाटोळे केले म्हणून आपणच टाळ पिटू निर्ल्लज सरकार असं म्हणत रूपाली पाटील यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.
पिस्तुल काढणं, सोडून द्या…अन्..”; आदित्य ठाकरेंचा वेदांत प्रकल्पावरून शिंदेंवर निशाणा
वेदांत प्रकल्प हा एक लाख कोटी रूपयांची गुंतवणुक असलेले डिस्ले फॅब्रिकेशन, 63 हजार कोटी रूपये गुंतवणुकीचे समीकंडक्टर्स तसेच 3800 कोटी रूपयांचा चाचणी प्रकल्प आहे. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे २० बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे. सुमारे एक लाख इतकी रोजगारक्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावला आहे.
Read also
- संजय शिरसाठांना पुन्हा एकदा डावललं..! शिंदे गटाच्या नियुक्त्या जाहीर
- “हे सरकार हार-तुरे अन् उत्सवांमध्ये व्यस्त, विरोधकही काही बोलत नाहीत”; राजू शेट्टी आक्रमक
- “पोलीस ठाण्यात जाऊन माझं काम मी इमानदारीनं केलंय”; नवनीत राणा
- “13 व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलं, तिच्यावर आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही”; किशोरी पेडणेकर
- “शहाजी पाटलांनी माझ्याकडे यावं, त्यांना मातोश्रीवर चांगली खुर्ची देतो”