मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसापासून विविध मुद्यावरून राजकारण चांगलचं तापलं आहे. महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून जोरदार टिका केली जात आहे. यामध्ये रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी देखील उडी घेतली आहे. त्यावरून त्यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला.
विरोधकांचा समाचार, तर हिंदुत्वाचा ज्वलंत मुद्दा, राज ठाकरे औरंगाबादच्या सभेत काय बोलणार?
मुख्यमंत्री हे कर्तबगार असल्यामुळे जनता या महामारीशी या जनतेला वेळेत उपचार मिळत नव्हते. ऑक्सिजन मिळत नव्हते आणि हे मात्र पिंजऱ्यात बसून डरकाळ्या फोडत होते. मला वाटतं की जसं तुम लढो हम कपडे संभालते है. तसं कार्यकर्त्यांना सांगायचं की तुम्ही लढा, स्वत:वर गुन्हे दाखल करून घ्या आणि मी मात्र ऐश्वर्यामध्ये सत्ता उपभोगण्याचं काम करतो. केवळ मी एकटाच नाही तर माझ्या घरादारासकट मंत्री मंडळात घेऊन, आम्ही तुपाशी आणि तुम्हा रहा उपाशी अशी त्यांची एकंदरीत कृती आहे. असंही ते म्हणाले.
“…मग त्यांना गटांगळ्या खाव्या लागतील”; संजय राऊतांचा विरोधकांना सुचक इशारा
राज्यात सध्या हिंदुत्वाची मुद्दा चांगलाचं पेटला आहे. त्यावर बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, दुसऱ्या बाजूला कडवं हिंदुत्व जे शिवसेनेने धारण केलेलं होतं. गर्व से कहो हम हिंदु है.. ही घोषणा खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. ते ताठ मानेने सांगायचे की हा हिंदुस्थान हिंदूचा. ते काॅंग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिटस्टांवर तुटुन पडायचे. मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांची भाषणं थोडी ऐकावीत. हिरवा शालू नेसलेली राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस सुर्यादय होण्या अगोदर लगेच त्यांच्या अंगावर भगवा शालू आला, ही दिव्य स्वप्न मुख्यमंत्र्यांना कशी काय पडली? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
“राष्ट्रवादी ही चाळीस चोरांची टोळी, त्यांच्या गुहेत दोन चोरांचे साथीदार”; खोतांचा पुन्हा एकदा टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही आता हिरवा शालू पांघरलेल्यांचा पदर डोक्यावर घेऊन सत्तेच्या खुर्चीवर बसलेले आहात. तुमचं हिंदुत्व आता नामोहरण झालेलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या मुशीतून तयार झालेलं ते रसायन आहे. हिंदुत्वाला फुंकर घालण्याचं काम राज ठाकरे यांनी केलं आहे, त्याच्या आता ज्वाला भडकलेल्या आहेत. या ज्वालांमध्ये भस्म होतं. हे भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल. असंही ते म्हणाले.
Read also:
- “आमच्यापेक्षा जास्त वेळ घेऊन हनुमान चालिसा वाचून दाखवा”; धनंजय मुंडेंचं विरोधकांना आव्हान
- “ज्यांनी म्हटलं होतं सरकार पडेल, त्यांना आता काय वाटतं, ते मला माहिती नाही”
- “ये रिश्ता क्या कहता है..! भाभीजी युसुफ लकडावाला से क्या ले रही है”
- “दंगली पसरू देऊ नका, शांतता व सलोखा राखा”; राज ठाकरेंच्या सभेपुर्वी वंचितचा कार्यकर्त्यांना आवाहन
- “मुख्यमंत्र्यांची अवस्था सध्या गजनीसारखी”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याला मनसेकडून प्रत्युत्तर