मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर काल इडीने कारवाई केली. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. इडीने कारवाई केल्यानंतर संजय राऊतांनी भाजपचे नेते किरीट सोमय्यांवर आयएनएस विक्रांत प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत. त्यानंतर त्यांनी शरद पवार, नितीन गडकरी आणि राज्यातील काही आमदारांच्या नेत्यांसह चहापानाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर मुंबईत ईडीच्या विरोधात संजय राऊतांनी शक्तिप्रदर्शन करत भाजपवर हल्लाबोल केला.
वसंत मोरेंची अखेर शहराध्यक्ष पदांवरून हाकालपट्टी! साईनाथ बाबर नवे शहराध्यक्ष
संजय राऊत यांचं मुंबई विमानतळावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं. त्यावेळी संजय राऊतांचं बंधू देखील विमानतळावर उपस्थित होते. विमानतळावरून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्याकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी भाजपच्या लोकांकडून आयएनएस विक्रांत घोटाळा करण्यात आला आहे. त्यामुळे जशी पावलं भाजप टाकणार तशीच आम्ही देखील टाकणार आहोत. त्यासाठी आम्हाला तुरूंगात टाकतील त्याची देखील तयारी आमच्याकडे आहे. आम्हाला ठार मारून टाकतील त्य़ाचीही तयारी आमच्याकडे आहे. मात्र पुढची 25 वर्ष राज्यात भाजपची सत्ता येणार नाही. अंसही त्यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांना घेऊन किरीट सोमय्या इडीच्या दरबारी! नवी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत
केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया म्हणजे पाठीत खंजीर खुपसणं सारखं आहे. आयएनएस विक्रांत संबंधी मी राज्यसभेत मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी देखील विरोधी पक्षातील नेत्यांनी यावर भूमिका मांडली. त्याठिकाणी भाजपचे देखील नेते उपस्थित होते. परंतु त्यांनी यावर एक शब्द काढला नाही. कारण त्यांना देखील हे समजलं आहे की यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. असंही ते म्हणालेत.
तुमच्याच पक्षाचे नेते मलिकांपेक्षा संजय राऊत जास्त महत्वाचे का? इम्तियाज जलीलांचा सवाल
दरम्यान, यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राऊतांवर निशाणा साधताना ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?? काळा पैसा मिळवायचाय, अन् कारवाई झाली की बोंबलायचं.. त्यानंतर केलेली पापं झाकण्यासाठी शक्ती प्रदर्शन करायचं. यातून जनतेने काय बोध घ्यावा? संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर? असा सवाल केला आहे.
Read also:
- अभिनेत्री आसावरी जोशी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; अजित पवार यांची उपस्थिती
- बकरी, वाघाच्या लढाईत बकरीला वाचवणं गरजेचं! एसटी कर्मचाऱ्यांना आता २२ एप्रिलची दिली तारीख
- वसंत भाऊ तुमची हत्या केली की, आत्महत्या हे सर्व महाराष्ट्र पाहत आहे; रूपाली पाटलांची प्रतिक्रिया
- खरा मावळा! गेल्या 27 वर्षापासून साहेबांसोबत आहे आणि पुढेही राहणार; वसंत मोरे
- भाजपच्या जवळ जो व्यक्ती, पक्ष गेला, तो संपला! रोहित पवारांचा राज ठाकरेंना सल्ला