मुंबई : गेल्या तीन महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा विलगीकरणाच्या मुद्यावरून राज्यात अविरत संघर्ष सुरु आहे. एसटीचं विलगीकरण झालचं पाहिजे या मुद्द्यावरून अजूनही एसटीचे कर्मचारी हे आझाद मैदानात उपोषणास बसलेले आहेत. त्यांना राज्यभरातील इतर कर्मचाऱ्यांचा पाठींबा मिळाला. सरकारने विलगीकरणासाठी एक समिती स्थापन केली होती, मात्र या समितीनेही विलगीकरणाच्या विरुद्ध अहवाल कोर्टात सादर केल्याने विलगीकरण शक्य नसल्याचेही समोर आले होते. यावर आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाष्य़ केलं आहे.
तुमच्याच पक्षाचे नेते मलिकांपेक्षा संजय राऊत जास्त महत्वाचे का? इम्तियाज जलीलांचा सवाल
गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं संप सुरू आहे. त्यावर न्यायालयाने 15 एप्रिल पर्यंत कामावर येण्याचं आवाहन न्यायालायने केलं आहे. न्यायालयाने जी एसटी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली होती. त्याबाबत विचारणा केली. पंरतु आम्ही याआधी जवळपास 7 वेळा एसटी कर्मचाऱ्यांना काम येण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्राच्या जनतेला वेठीस धरून कुठल्याही प्रकाचं आंदोलन करू नका. आपल्यावरील सर्व कारवाया आम्ही मागे घेऊ. अंस अनिल परब यांनी म्हटलं आहे.
तुम्ही तर काय $$$? काय कापलं सांगा? राऊतांची फडणवीसांवर टीका करताना जीभ घसरली
न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आम्ही म्हणालो की, कुठल्याही एसटी कर्मचाऱ्यांची नोकरी जाईल, अशा पद्धतीची कारवाई केली नाही. परंतु आम्हाला शिस्त भंगाची कारवाई करावी लागली. तसेच एसटी कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई न करता त्यांना 22 एप्रिल पर्यंत कामावर येण्याचं आवाहन करण्यास सांगितलं आहे. बकरी, वाघाच्या लढाईत बकरीला वाचवणं गरजेचं असं न्यायालयाने देखील म्हटलं आहे.
देशद्रोही किरीट सोमय्यांची वकिली फडणवीसांनी करू नये; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
दरम्यान, गेल्या दोन वर्षात एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती वाईट झाली आहे. त्यामुळे काही गोष्टी रखडल्या होत्या. त्याच काळात एसटीचे आणि कर्मचाऱ्यांचेही नुकसान झालं आहे. न्यायालयाने दिलेल्या मुदतीत जे कर्मचारी येणार नाही त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. त्या कर्मचाऱ्यांनी ठरवायचं आहे की कोणाच्या निर्णयाने चालयचं आहे. जरी एसटी कर्मचाऱ्यांनी सदावर्तेंच ऐकुण कर्मचारी कामावर आले नाही तर ही नुकसानीची जबाबदारी सदावर्तेंची असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also:
- वसंत भाऊ तुमची हत्या केली की, आत्महत्या हे सर्व महाराष्ट्र पाहत आहे; रूपाली पाटलांची प्रतिक्रिया
- खरा मावळा! गेल्या 27 वर्षापासून साहेबांसोबत आहे आणि पुढेही राहणार; वसंत मोरे
- भाजपच्या जवळ जो व्यक्ती, पक्ष गेला, तो संपला! रोहित पवारांचा राज ठाकरेंना सल्ला
- वसंत मोरेंची अखेर शहराध्यक्ष पदांवरून हाकालपट्टी! साईनाथ बाबर नवे शहराध्यक्ष
- शेतकऱ्यांना घेऊन किरीट सोमय्या इडीच्या दरबारी! नवी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत