पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचं अधिवेशन काल नवी दिल्लीतील एका स्टेडिअरवर पार पाडलं. मात्र यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात नाराजी नाट्यमय रंगल. अजित पवार यांच्या अगोदर जयंत पाटलांना भाषण करण्याची परवानगी दिली. त्यानंतर अजित पवार अचानक पणे निघून गेल्याने अनेकांना त्याचा धक्का बसला. त्यावरून तुषार भोसले यांनी राष्ट्रवादीवर टिका केली आहे.
“भविष्यात देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजे”
राष्ट्रवादी काॅंग्रेसने अजित पवार यांचा दिल्लीत बोलावून अपमान केला. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: आग्रह करून सुद्धा त्यांनी भाषण केलं नाही म्हणून आकांडतांडव करणाऱ्या आणि नाकाने कांदे सोलणाऱ्या सुप्रिया सुळेंनी आज दिल्लीच्या कार्यकारिणीमध्ये बोलू दिलं नाही. अरे किमान स्वत: च्या पक्षात तरी त्यांचा मान सन्मान ठेवा मग दुसऱ्यांना अक्कल शिकवा असं भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी म्हटलं आहे.
“काॅंग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष, नितीन गडकरींनी काॅंग्रेसमध्ये यावं”; नाना पटोलेंची गडकरींना ऑफर
त्यानंतर तुषार भोसले यांच्यावर टिका करण्यात आली. शरद पवार आणि अजित पवार हे एकाच बाजूच्या दोन बाजू आहेत. शरद पवार यांनी महाराष्ट्रात अनेक जातीधर्माला एकत्रित करण्याचं काम केलं आहे. त्याचसोबत सध्या शरद पवार देशातील सर्वच विरोधी पक्षांना जोडण्याचं काम करीत आहेत. त्यामुळे तुषार भोसले यांनी राक्षशी दानवाप्रमाणे टिका करू नये. असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी दिला आहे.
“फडणवीस इस्लाम कबूल करत आहेत की रऊफला कुंभमेळ्याचे निमंत्रण देत आहेत ?”; सुषमा अंधारेajit pawar ajit pawar
दरम्यान, अजित पवार यांना भाषण न झाल्याच्या प्रकरणावर जंयत पाटील म्हणाले की, अजित पवार माझ्यावर अजिबात नाराज नाहीत. असं आहे की, कुणी लघूशंकेला गेलं तर त्याचीही बातमी करणं योग्य नाही. शरद पवारांच्या भाषणाला उपस्थित राहता यावं. म्हणून माझं भाषण सुरू असताना अजित पवार लघूशंकेला जाऊन आले अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली.
Read also
- “शिवसेनेनं जे अडीच वर्षात पेरलंय, ते आता उगवतंय”
- “उद्धव ठाकरे भविष्यात पंतप्रधान होतील, याच भीतीने भाजपने ‘शिवसेना’ फोडली”
- “राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्याच नावावर चालतो”; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
- “आम्हाला असं वाटतं की आम्ही बारामती जिंकू”; चंद्रशेखर बावनकुळे
- “अजित पवार नाराज नाही, ते लघूशंकेला गेले होते”; नाराजी नाट्यमयानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया